शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

समाजात साहित्यिकाचे स्थान अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:32 IST

समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्य व साहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ कादंबरीचे युवा लेखक नवनाथ गोरे यांनी केले.

ठळक मुद्देनवनाथ गोरे : सावानाच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन

नाशिक : समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्यसाहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ कादंबरीचे युवा लेखक नवनाथ गोरे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी (दि.१३) करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून गोरे बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ‘लोकमत’च्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर होत्या. समवेत कवी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी संजय चौधरी, सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके उपस्थित होते. यावेळी गोरे म्हणाले, नाशिकच्या भूमीने शारदेला अनेक बहुमूल्य रत्न दिले आहे, त्यामुळे ही भूमी नेहमीच श्रेष्ठ ठरणारी आहे. या भूमित मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच पाय ठेवण्याची संधी लाभली हे भाग्यच. काळानुरूप साहित्यिकाने आपल्यामध्ये बदल करून माहिती तंत्रज्ञानाच्या युगाचा फायदा साहित्याच्या प्रगतीसाठी करून घ्यायला हवा. कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘शेवटी साहित्यिक हा शब्दांचा सौदागर आहे’, हे विसरून चालणार नाही, असे गोरे म्हणाले.प्रास्ताविक प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. शंकर बोºहाडे यांनी केले.आजचा काळ गुंतागुंतीचा : अपर्णा वेलणकरअपर्णा वेलणकर यांनी आजचा अभिव्यक्तीचा काळ हा संभ्रमावस्था निर्माण करणारा असल्याचे सांगितले. सोशल मीडियाद्वारे मनुष्य हजारोंच्या संख्येने लोकांशी जोडला गेला असला तरीदेखील त्याला त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखविण्यासाठी असा एक जवळचा मित्र या काळात सापडणे दुरापास्त झाले आहे, हीदेखील चिंतेची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे हा काळ एकाकीपणाची जाणीवदेखील करून देतो.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिकcultureसांस्कृतिक