शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महामार्गाच्या समांतर रस्त्याला खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:51 IST

मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्याला सर्वत्र खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्याला सर्वत्र खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेज, कोणार्कनगर, प्रेमदान हॉस्पिटल जवळ, बहिणाबाई चौधरी कॉलेज, हनुमाननगर यांसह मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसरातील सर्व्हिस रोडवर पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. याशिवाय कोणार्कनगर ते अमृतधाम, मीनाताई ठाकरे ते के. के. वाघ कॉलेज येथे सर्व्हिस रोडवर पथदीप बसविण्याचादेखील प्रशासनाला विसर पडला असल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडतात. या खड्ड्यांमुळे वाहनांचेदेखील मोठे नुकसान होते. खड्डे बुजविण्यासाठी वारंवार मागणी करूनदेखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहे.आडगावचे रस्ते खड्ड्यातमुंबई-आग्रा महामार्गावरून आडगाव गावात जाणारा रस्ता हा जुना महामार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून आडगाव, सय्यद पिंपरी, विंचूर गवळी येथील नागरिकांचा राबता असतो, शिवाय शेतमाल वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. वाहतुकीच्या वर्दळीमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा