शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

पिंपळगावी टोल कामगारांचे काळ्या फिती बांधून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:55 IST

पिंपळगाव बसवंत : सरकारने टोलनाके बंद करण्याच्या केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ पिंपळगावसह देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला.

ठळक मुद्देजोरदार घोषणाबाजी : टोलनाके बंदच्या शासन निर्णयाचा निषेध

पिंपळगाव बसवंत : सरकारने टोलनाके बंद करण्याच्या केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ पिंपळगावसह देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला.शासनाची घोषणा टोल कामगारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे सरकारने डिजिटल इंडिया जरूर करावे. मात्र, ते करत असताना बेरोजगार इंडियाचा पण विचार करावा. टोल नाक्यावर (जी. पी. एस.) धोरण अवलंबत असताना कुठल्याही प्रकारे टोल कर्मचारी बेरोजगार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, यासाठी टोल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून शासनाच्या टोल बंदच्या निर्णयाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटना सरचिटणीस अजय लोढा, कार्य अध्यक्ष रामेश्वर भावसार, सहसचिव सुधीर डांगळे, पिपळगाव उपअध्यक्ष तुषार साळवे, उपअध्यक्ष सुवर्णा बोरसे, उपअध्यक्ष मीनाक्षी गांगुर्डे, तसेच कर्मचारी रूबिना शहा, भाग्यश्री उघडे, प्रमिला चव्हाण, मुक्ता ठाकरे, कविता साबळे, रामनाथ गव्हाणे, राकेश चौधरी, भरत मांदळे, संपत कडाळे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.लाखो कामगारांची उपासमारसरकार पुढील एका वर्षात देशातील सर्व टोल प्लाजा बंद करण्याच्या योजनेवर काम करीत आहे. टोल बंद करण्याचा अर्थ टोल प्लाजा बंद करण्याशी संबंधित आहे. सरकार अशा तांत्रिक गोष्टींवर काम करीत आहे. मात्र, यामुळे लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनेच्यावतीने संपूर्ण भारतभर सरकारच्या निर्णयाविरोधात टोल नाक्यावर सर्व कामगार बांधवांनी शांततेत दिवसभर काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध नोंदविला व टोल बंदच्या निर्णयावर कडकडीत विरोध दर्शविला.डिजिटल इंडिया जरूर करावा, त्याला आमचा विरोध नाही. मात्र, टोल कर्मचारी बेरोजगार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आमचे अर्धे आयुष्य टोल नाक्यावर काम करत गेले आहे. टोल नाकाच बंद झाला तर आमच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळेल. त्यामुळे शासनाने आम्हा कर्मचाऱ्यांचा विचार करावा.- भाग्यश्री उघडे, टोल कर्मचारी, पिंपळगाव बसवंत शासनाच्या निर्णयानुसार टोल नाके संपुष्टात आले तर टोल नाक्यावर काम करणारे लाखो कामगार बेरोजगार होतील. शासनाचा डिजिटल इंडिया बेरोजगार इंडिया झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे टोल नाका बंदच्या निर्णयावर आम्ही काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला.- सुवर्णा बोरसे, महाराष्ट्र टोल कामगार संघटना, उपाध्यक्ष 

टॅग्स :tollplazaटोलनाकाStrikeसंप