शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

स्वार्थीपणामुळे संस्कृतीचे चित्र बिघडले : अनिल अवचट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:50 IST

स्वत:च्या फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार म्हणजे आपली संस्कृती असून, आजच्या स्थितीत समाजातील मोठा वर्ग स्वत:पुरता केंद्रित होऊन स्वत:च्या फायद्याचा विचार करू लागल्याने आज सर्वत्र संस्कृतीचे चित्र बिघडलेले दिसत असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली.

नाशिक : स्वत:च्या फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार म्हणजे आपली संस्कृती असून, आजच्या स्थितीत समाजातील मोठा वर्ग स्वत:पुरता केंद्रित होऊन स्वत:च्या फायद्याचा विचार करू लागल्याने आज सर्वत्र संस्कृतीचे चित्र बिघडलेले दिसत असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली.भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी (दि.१७) तीनदिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ‘बदलती संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नामकोचे चेअरमन सोहनलाल भंडारी यांच्यासह व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बुरड, राजू धाडीवाल, यतीश डुंगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. अनिल अवचट म्हणाले, जात, धर्म, संस्कृतीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. पूर्वी जमिनीला आईसमान मानले जात, परंतु आता जमिनीला किती पैशाचे मोल आहे याचाच विचार केला जातो. मात्र, माणूस दिवसेंदिवस एकाकी जीवनाक डे वळतो आहे. सर्वांनी या स्थितीतून बाहेर पडून ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे’ या पंक्तीप्रमाणे समाजातील अनाथ, वेश्या, दुर्बल यांसारख्या वंचित घटकांसाठी सेवाभावनेने काम करण्याजी गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.निसर्ग संवर्धनाचे आवाहनवाढत्या शहरीकरणातून निर्माण झालेल्या एकाकीपणाचे दुष्परिणाम सांगतानाच पूर्वीची विकेंद्रित जीवनशैली पर्यावरण संवर्धन करणारी असल्याचे डॉ. अनिल अवचट यांनी अधोरेखित केले. परंतु, वसाहतवादी ब्रिटिशांनी पर्यावरणाचा ºहास सुरू केला असून, तो आजही सुरू आहे. देशाची संपत्ती लुटण्यासाठी बनविलेली केंद्रे इंग्रजांनंतरही आपल्या सत्ताधाऱ्यांनी कायम ठेवल्याने त्याचे शहरात रूपांतर होऊन कचरा, सांडपाणी व प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगताना सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. अवचट यांनी केले.

टॅग्स :Anil Avchatअनिल अवचटcultureसांस्कृतिक