शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

विंंचूरला पेट्रोलपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:36 IST

शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने शेतकºयांबरोबरच जनतेलाही जगण्यासाठी तो आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची गरज लागते. तसेच पुढील खरीप हंगामाच्या मशागतीसाठी देखील ट्रँक्टरसारख्या वाहनांची आवश्यकता आहे, परंतु पेट्रोलपंप बंद असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे हाल : लॉकडाउनचा फटका; जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

विंचूर : लॉकडाउनमुळे येथील दोन्ही पेट्रोलपंप बंद असल्याने इंधन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमाल हा खराब होणारा असल्याने त्याची वेळेवर विक्री करावी लागते. तसेच शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने शेतकºयांबरोबरच जनतेलाही जगण्यासाठी तो आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची गरज लागते. तसेच पुढील खरीप हंगामाच्या मशागतीसाठी देखील ट्रँक्टरसारख्या वाहनांची आवश्यकता आहे, परंतु पेट्रोलपंप बंद असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहे. पेट्रोलपंपाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश आहे, परंतु येथील पेट्रोलपंपधारकांनी आपले पेट्रोलपंप बंद ठेवल्याने शेतकºयांना शेतमाल ने-आण करण्यासाठी अडचणी येत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात विंंचूर उपबाजार आवार ही जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती आहे जी मोकळ्या कांद्याचे लिलाव करीत आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत जिल्ह्याबाहेरून शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत असल्याने बाजार समिती पूर्ण भरून बाहेर अडीच ते तीन किलोमीटरच्या रांगा लागत आहेत. त्यातच येथील दोन्ही पंप महामार्गावर असूनदेखील बंद असल्याने शेतकºयांना डिझेलअभावी पायपीट करीत भरवस फाटा किंवा नैताळे येथे जावे लागते. तेथून डिझेल आणावे लागते. येथील किल्लेवाला पंपावर कर्मचारी नसल्याने पंप बंद असल्याचे सांगितले जाते तर लोखंडवाला पंपावर कर्मचारी उपस्थित असतानादेखील डिझेल विक्री बंद केली आहे, असा संताप त्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये शेतमाल विक्री, वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली परंतु डिझेल मिळत नसल्याने शेतकºयांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अत्यावश्यक सेवा बंद ठेवल्या तर त्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगितले जात असताना येथील पेट्रोलपंप बंद असल्याने त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPetrol Pumpपेट्रोल पंप