शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

विंंचूरला पेट्रोलपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:36 IST

शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने शेतकºयांबरोबरच जनतेलाही जगण्यासाठी तो आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची गरज लागते. तसेच पुढील खरीप हंगामाच्या मशागतीसाठी देखील ट्रँक्टरसारख्या वाहनांची आवश्यकता आहे, परंतु पेट्रोलपंप बंद असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे हाल : लॉकडाउनचा फटका; जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

विंचूर : लॉकडाउनमुळे येथील दोन्ही पेट्रोलपंप बंद असल्याने इंधन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमाल हा खराब होणारा असल्याने त्याची वेळेवर विक्री करावी लागते. तसेच शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने शेतकºयांबरोबरच जनतेलाही जगण्यासाठी तो आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची गरज लागते. तसेच पुढील खरीप हंगामाच्या मशागतीसाठी देखील ट्रँक्टरसारख्या वाहनांची आवश्यकता आहे, परंतु पेट्रोलपंप बंद असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहे. पेट्रोलपंपाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश आहे, परंतु येथील पेट्रोलपंपधारकांनी आपले पेट्रोलपंप बंद ठेवल्याने शेतकºयांना शेतमाल ने-आण करण्यासाठी अडचणी येत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात विंंचूर उपबाजार आवार ही जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती आहे जी मोकळ्या कांद्याचे लिलाव करीत आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत जिल्ह्याबाहेरून शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत असल्याने बाजार समिती पूर्ण भरून बाहेर अडीच ते तीन किलोमीटरच्या रांगा लागत आहेत. त्यातच येथील दोन्ही पंप महामार्गावर असूनदेखील बंद असल्याने शेतकºयांना डिझेलअभावी पायपीट करीत भरवस फाटा किंवा नैताळे येथे जावे लागते. तेथून डिझेल आणावे लागते. येथील किल्लेवाला पंपावर कर्मचारी नसल्याने पंप बंद असल्याचे सांगितले जाते तर लोखंडवाला पंपावर कर्मचारी उपस्थित असतानादेखील डिझेल विक्री बंद केली आहे, असा संताप त्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये शेतमाल विक्री, वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली परंतु डिझेल मिळत नसल्याने शेतकºयांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अत्यावश्यक सेवा बंद ठेवल्या तर त्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगितले जात असताना येथील पेट्रोलपंप बंद असल्याने त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPetrol Pumpपेट्रोल पंप