शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

प्लॅस्टीक बंदीसाठी पेठ तालुका सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 13:00 IST

रामदास शिंदे पेठ- स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला पेठ तालुक्यात प्रारंभ झाला असून शासकिय अधिकाऱ्यांसह कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य, अंगणवाडी आदींनी या अभियानात सक्रि य सहभाग घेतल्याने लवकरच पेठ तालुका संपुर्ण प्लास्टिक मुक्त घोषीत होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

रामदास शिंदेपेठ- स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला पेठ तालुक्यात प्रारंभ झाला असून शासकिय अधिकाऱ्यांसह कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य, अंगणवाडी आदींनी या अभियानात सक्रि य सहभाग घेतल्याने लवकरच पेठ तालुका संपुर्ण प्लास्टिक मुक्त घोषीत होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पेठ तालुक्यात मोठी गावे वगळता वाडीवस्तीवर प्लास्टिकचा वापर तसा अभावानेच होतो.निसर्गाशी जुळवून घेतलेल्या जनतेने त्याच्या संरक्षणाचीही जबाबदारी घेतल्यास पर्यावरण रक्षणाचे मोठे काम होणार असल्याने दिनांक १ आॅगष्टपासून तालुक्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात आले आहे. यातंर्गत चार दिवसात क्षेत्रिय अधिकार्यच्या मार्फत जवळपास २०० प्राथमिक शाळांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर कचरा व प्लॅस्टिक संकलनाचे नियोजन करण्यात आले असून गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व विभागाच्या खाते प्रमुखांची संयुक्त कार्यशाळा घेण्यात आली. स्वच्छ भारत आभियान गटसाधन केंद्राकडून दिलेल्या नियोजनानुसार प्लास्टिक संकलन करण्यात येणार असून संपुर्ण प्लॅस्टिक मुक्तीची जनजागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.-----------------------जनतेसह लोकप्रतिनिधींचाही सहभागस्वच्छ सर्वेक्षण अभियानात शासकिय यंत्रणेसह लोकप्रतिनिधी, राजकिय पक्षांचे प्रतिनिधी, सरपंच व सदस्य, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समतिी अध्यक्ष व सदस्य आदींचाही सहभाग घेण्यात आला आहे. गाविनहाय समित्यांची स्थापना करून प्रथम जनजागृती, संकलन व त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने आता प्लॅस्टिक बंदीची लढाई आर या पार होणार असल्याचे दिसून येते.-----------------------स्वतंत्र अ‍ॅपची निर्मितीस्वच्छ सर्वेक्षण अभियानात सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणावर उपयोग करून घेण्यात आला असून सहभागासाठी अ‍ॅपलीकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्य जनतेसह कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी नी सदरचे अ‍ॅप डाऊनलोड करून या अभियानात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पेठ तालुक्यात जवळपास २०० गावे, ७३ ग्रामपंचायत, २३० शाळा असून गावस्तरावर विविध उपक्र म राबवून प्लॅस्टिकचे संकलन, विलीणीकरण व विद्यटनाची प्रक्रि या समजून सांगितली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक