शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पेठ तालुका कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:47 IST

नाशिक : जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, देवळा आणि कळवण ही चार तालुके कोरोनामुक्त होते. मात्र, जुलै महिना सुरू होईपर्यंत प्रारंभी देवळा आणि कळवण तर त्यानंतर सुरगाणा आणि पेठ तालुक्यातही कोरोनाचे काही बाधित आढळून आले. मात्र, जुलैच्या अखेरपर्यंत त्यातील पेठ तालुक्यातील बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असल्याने पेठ तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे.

ठळक मुद्देसुवार्ता : सुरगाणा, कळवण तालुक्यांत नाही एकही कोरोनाबळी

धनंजय रिसोडकर।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, देवळा आणि कळवण ही चार तालुके कोरोनामुक्त होते. मात्र, जुलै महिना सुरू होईपर्यंत प्रारंभी देवळा आणि कळवण तर त्यानंतर सुरगाणा आणि पेठ तालुक्यातही कोरोनाचे काही बाधित आढळून आले. मात्र, जुलैच्या अखेरपर्यंत त्यातील पेठ तालुक्यातील बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असल्याने पेठ तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे.जून महिन्याच्या अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्णातील १५ तालुक्यांपैकी केवळ ११ तालुकेच बाधित झालेले होते. त्यावेळी देवळा, सुरगाणा, पेठ आणि कळवण या तालुक्यांमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे आदिवासी क्षेत्र असलेल्या या भागात किमान कोरोना पोहोचू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जुलै महिन्याच्या प्रारंभीच चारही तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण जिल्हाच कोरोनाबाधित झाला होता. त्यात दोन बाधितांपासून प्रारंभ झालेला पेठ तालुका गत २५ दिवसांत १९ बाधितांपर्यंत आकडा पोहोचला होता. या सर्व बाधितांवर तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. या १९ बाधितांपैकी १७ बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याने तो पूर्णपणे कोरोनामुक्त झाला. या तालुक्यातील केवळ दोनच बाधितांचा जुलै महिन्याच्या पूर्वार्धातच मृत्यू झाला होता. कळवण तालुकाही कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्णातील कोरोनाबाधित तालुक्यांमध्ये सगळ्यात कमी बाधित हे पेठ, कळवण आणि सुरगाणा या तीन तालुक्यांमध्येच होते. त्यातील कळवण तालुक्यातही रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतण्याचे प्रमाण मोठे आहे.आता कळवणला केवळ दोन कोरोनाबाधित तर सुरगाण्याला १३ बाधित उरले आहेत. कळवणला अवघे दोन बाधित उरले असल्याने नवीन बाधित न आढळल्यास कळवणची वाटचालदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.दोन तालुक्यांत नाही एकही मृत्यूजिल्ह्णातील १५ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांमध्ये आतापर्यंत कमी अधिक प्रमाणात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. त्यातील सगळ्यात कमी म्हणजे केवळ एक मृत्यू त्र्यंबकेश्वर तालुक्यात, दोन मृत्यू पेठ तालुक्यात झाले आहेत, तर सुरगाणा आणि कळवण या दोन तालुक्यांमध्ये अद्याप एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या इतक्या थैमानातही हे दोन तालुके त्यामानाने सुदैवी ठरले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या