शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

पेठ : नगरपंचायत सत्ताधारी गटासह विरोधकही रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:42 IST

पेठ : नगरपंचायतीच्या अस्तित्वानंतरच्या अडीच वर्षांच्या काळात पेठ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण सर्वसाधारणसाठी (जनरल) जाहीर झाल्याने ३० मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, पेठ शहरातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.पेठ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने आठ जागा जिंकून सत्ता काबीज केली नंतरच्या काळात एका ...

ठळक मुद्दे पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान चार उमेदवारी अर्ज दाखल

पेठ : नगरपंचायतीच्या अस्तित्वानंतरच्या अडीच वर्षांच्या काळात पेठ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण सर्वसाधारणसाठी (जनरल) जाहीर झाल्याने ३० मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, पेठ शहरातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.पेठ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने आठ जागा जिंकून सत्ता काबीज केली नंतरच्या काळात एका अपक्षाने सेनेला पाठिंबा दिल्याने व नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडल्याने लता सातपुते व कुमार मोंढे यांच्या नावाची चर्चा असताना पक्षीय स्तरावर संगनमत होऊन लता सातपुते यांना पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.अडीच वर्षांच्या काळानंतर पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या असून, होणाºया निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज घोंगे व कुमार मोंढे यांनी अर्ज दाखल केले आहेत.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गौरव गावित व माकपाचे जावेद शेख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेकडे अपेक्षित संख्याबळ असले तरीही बिनविरोध निवडीच्या आशा धुसर झाल्या आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेकडे स्वीकृत सदस्यांसह ११ नगरसेवकांचे भक्कम संख्याबळ असल्याने आगामी नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार हे नक्की असताना घोंगे व मोंढे यापैकी कोणाची वर्णी लागते हे माघारीनंतरच कळेल.मनोज घोंगे यांना मागील अडीच वर्ष उपनगराध्यक्षपद दिल्याने कुमार मोंढे दावा करू शकतात तर अडीच वर्षाच्या प्रशासकीय अनुभवावर मनोज घोंगे अपेक्षा करणार असे चित्र दिसून येत आहे.उपनगराध्यक्ष निवड ३० रोजीचनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रि या पार पडल्यानंतर लगेचच त्याच दिवशी पिठासन अधिकाºयांच्या देखरेखीत उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांना माघार घेण्याची वेळ आलीच तर उपनगराध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून शिवसेना दोघांची नाराजी दूर करेल असे दिसून येते. २९ मे ला माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार असल्याने पेठ शहरात विविध राजकीय हालचालींवर गरमागरम चर्चा घडून येत आहेत.