शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

यशवंतराव चव्हाण साहित्याने व्यापलेले व्यक्तिमत्त्व : भावे

By admin | Updated: October 23, 2016 00:17 IST

सार्वजनिक वाचनालय : नूतन कोनशिलेचे अनावरण

नाशिक : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांचे जीवन म्हणजे साहित्य भरलेले व्यक्तिमत्त्व असून, त्यांचे संपूर्ण जीवनच साहित्याने व्यापलेले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सात साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, तर पाच साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते. त्यांनी २० पुस्तके लिहिली; मात्र एकदाही ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नसल्याची भावे यांनी खंत व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या भिंतीवर नूतन कोनशिलेचे अनावरणप्रसंगी ‘यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यिक योगदान’ विषयावर बोलताना ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास देशमुख, उपाध्यक्ष नरेश महाजन, प्रभारी कार्यवाह अ‍ॅड. अभिजित बगदे, देवदत्त जोशी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना भावे यांनी यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृष्णाकाठ’, ‘युगांतर’, ‘सह्याद्रीचे वारे’ आदि पुस्तकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत झालेल्या सर्व साहित्य संमेलन अध्यक्षांच्या तोडीची साहित्य निमिर्ती केली आहे; मात्र येथील साहित्य परंपरेतील सारस्वतांना एकदाही यशवंतराव चव्हाण यांना संमेलन अध्यक्षपदी बसविण्याची कल्पना सूचली नसल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सहकार, औद्योगिक विकासासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकासालाही त्यांनी चालना दिली. त्यांनी सहकाऱ्यांसोबत विरोधकांनाही सन्मान दिला; मात्र त्यांची ही राजकीय आणि सामाजिक मूल्ये आजमितीला हरवली असून, आजच्या समाजाने सामाजिक आणि राजकीय नेतृत्व गमावले असल्याची टीका त्यांनी सध्याच्या राजकारण्यांवर केली. यावेळी औरंगाबादकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. अभिजित बगदे यांनी प्रास्ताविक तर, देवदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)