शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

यंदा वाढणार मतांचा टक्का?

By धनंजय वाखारे | Updated: March 22, 2019 01:42 IST

गेल्या काही वर्षांत घटत चाललेली मतदानाची टक्केवारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था-संघटनांमार्फत मतदार जागृती केली जात आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक :१९६७ मध्ये सर्वाधिक ६५.७९, तर २००४ मध्ये सर्वात कमी ४३.१३ टक्के मतदानाची नोंद

नाशिक : गेल्या काही वर्षांत घटत चाललेली मतदानाची टक्केवारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था-संघटनांमार्फत मतदार जागृती केली जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी १९६७ साली नोंदविली गेली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी झालेली दुरंगी लढत एकमेव ठरली आहे. त्यावेळी, भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे बी.आर. कवडे यांनी रिपाइंचे दादासाहेब गायकवाड यांचा पराभव केला होता. मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४३.१३ टक्के मतदान २००४च्या निवडणुकीत झालेले आहे.आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघात १८ लाख ५३ हजार मतदार असून, तरुण मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या १६ लोकसभा निवडणुकांमध्ये नाशिक मतदारसंघात एकदाही मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांपलीकडे गेलेली नाही. नाशिक मतदारसंघात १९५१ मध्ये झालेल्या निवडणुकीत ३ लाख ८५ हजार ८६८ मतदार होते. त्यापैकी दोन लाख पाच हजार १७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी मतांची टक्केवारी ५३.१७ टक्के इतकी राहिली होती. विशेष म्हणजे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावूनही सर्वच्या सर्व मतदान वैध ठरले होते. त्यानंतर १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरून ते ४८.१३ टक्के इतके नोंदविले गेले. त्यावेळीही सर्वच्या सर्व मते वैध ठरली होती. १९६२ मध्ये ५४.१८ टक्के मतदान नोंदविले गेले तर १९६७ मध्ये झालेल्या दुरंगी सामन्यात सर्वाधिक ६५.७९ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली. तो आजतागायत विक्रम अबाधित आहे. त्यानंतर, १९७१ ते २००९ पर्यंत एकदाही मतांची टक्केवारी ६० टक्क्यांच्या पुढे सरकली नाही.सर्वात कमी मतदानाची टक्केवारी २००४ मध्ये ४३.१३ टक्के इतकी नोंदविली गेली. त्यावेळी रिंगणात नऊ उमेदवार होते. २००४ मध्ये १५ लाख २२ हजार ६६२ मतदार होते. त्यातील सहा लाख ५६ हजार ७४५ मतदारांनीच मतदान केले. म्हणजे निम्म्याहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला नाही. पुढे २००९ मध्ये १४ लाख ४८ हजार ४१४ मतदार होते. त्यापैकी सहा लाख ५७ हजार ८८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी ४५.४२ टक्के राहिली.मालेगाव मतदारसंघात १९६२ मध्ये सर्वाधिक नोंदजिल्ह्यातील पूर्वाश्रमीच्या मालेगाव लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी १९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत नोंदविली गेलेली आहे. त्यावेळी तिरंगी लढत होऊन चार लाख ६२ हजार ३०५ मतदारांपैकी तीन लाख आठ हजार ६३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात दोन लाख ७१ हजार १३२ मते वैध ठरली होती. त्यानंतर मालेगाव मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद १९९६च्या निवडणुकीत नोंदविली गेली. त्यावेळी रिंगणात ९ उमेदवार होते. १० लाख ५६ हजार ७१७ मतदारांपैकी चार लाख ४० हजार ८८२ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची सर्वात टक्केवारी ४१.७२ टक्के इतकी नीचांकी राहिली. २०१४ च्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीचा आलेख उंचावला गेला. दिंडोरी ह्या नव्या रचनेत बनलेल्या मतदारसंघात ६३.४१ टक्के मतदान नोंदविले गेले.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक