शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
2
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
3
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
4
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
5
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
6
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
7
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
8
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
9
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
10
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
11
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
12
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
13
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
14
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
15
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
17
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
18
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
19
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
20
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश

पर्यावरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

By admin | Updated: February 28, 2015 23:29 IST

आनंद कारंजकर : राष्ट्रीय चर्चासत्रात रक्षण, संवर्धनावर मान्यवरांचे मंथन

नाशिक : पर्यावरण ही जागतिक समस्या असून, पर्यावरण संवर्धनासाठीचे कायदेही सक्षम आहेत़ मात्र या कायद्यांचा उपयोग मनुष्य केवळ स्वत:च्या लाभासाठी करीत असून, कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो़ माणसाच्या बदललेल्या जीवनशैलीमुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, यासाठी जागरूक नसलेला शिक्षित समाज जबाबदार आहे़ पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबवायचा असेल, तर लोकांमध्ये पर्यावरणाप्रती संवेदना, जागृती व लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांनी केले़आॅल इंडिया फेडरेशन आॅफ विमेन लॉयर्स, हरितकुंभ समन्वय समिती, नाशिक बार असोसिएशन व आविष्कार या संस्थेतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित ‘पर्यावरण व कायदे’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी कारंजकर बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, माणूस दिवसेंदिवस प्रगती करीत असला, तरी त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींचा तो विचार करीत नाही़ वैयक्तिक सुखासाठी पर्यावरणाचा ऱ्हास करीत असून, त्यातूनच नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात़ पर्यावरणबदलाचे सर्वांवरच घातक परिणाम होत असून, याबाबत लोकांमध्ये असलेली नीतीमूल्यांबाबत जागृतीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले़विभागीय आयुक्त एकनाथ डौले यांनी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त कुंभमेळा करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे़ नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी शासन प्रयत्नशील असून, यामध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले़ जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी हरित कुंभ व गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी काम सुरू असून, ते लोकसहभाग, लोकजागृती व तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असल्याचे सांगितले़यावेळी व्यासपीठावर नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, आॅल इंडिया फेडरेशन आॅफ विमेन लॉयर्स संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड़ इंद्रायणी पटणी, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब आडके उपस्थित होते़ दरम्यान, समारोपसत्रात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणापुढे मर्यादा येतात. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्येच ‘ग्रीन बेंच’ स्थापन करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून पर्यावरणाशी संबंधित असलेल्या याचिकांवर तातडीने सुनावणी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणेने पर्यावरणाच्या संदर्भात असलेल्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितल्यास पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल, असे मत समारोपप्रसंगी अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी राजेश पंडित आणि अन्य पर्यावरणप्रेमींनी मते व्यक्त केली.