शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

लोकसहभाग : वीस गावांमध्ये शेळीपालनावर आधारित कार्यक्रम आदिवासी वस्त्यांमध्ये पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:11 IST

सिन्नर : युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील चास, कासारवाडी, सोनेवाडी व खंबाळे या गावातील सहा आदिवासी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करण्यात आली

ठळक मुद्दे२० गावांमध्ये शेळी पालनावर आधारित महिला उपजीविका विकास कार्यक्रमपिण्याच्या पाण्याची समस्या ही आदिवासी वस्त्यांवर जास्त

सिन्नर : युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील चास, कासारवाडी, सोनेवाडी व खंबाळे या गावातील सहा आदिवासी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करण्यात आली. या योजनांचे उद्घाटन संजय जोशी, संचालक, नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे, संचालक मनीषा पोटे, गावाचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन मुंबई यांच्या सहयोगातून मागील तीन वर्षांपासून सिन्नर तालुक्यामधील २० गावांमध्ये शेळी पालनावर आधारित महिला उपजीविका विकास कार्यक्रम, जमानदी खोरे विकास कार्यक्रम यासारखे ग्रामीण विकासाचे विविध उपक्रम राबवित आहे. सिन्नर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणूनच ओळखला जातो, त्यामुळे शेतीसाठी आणि पिण्यासाठी वर्षातील ४ महिने तालुक्यातील ४६ गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. युवा मित्र संस्थेला काम करत असताना लक्षात आले की, पिण्याच्या पाण्याची समस्या ही आदिवासी वस्त्यांवर जास्त आहे. प्रत्येक बोअरवेल शेजारी ५००० लिटरची पाण्याची टाकी बसवून, पाइपलाइनद्वारे ती भरण्याची व्यवस्था केली. ज्या ठिकाणी लाइटची व्यवस्था आहे तिथे मोटार बसवली व जिथे लाइट उपलब्ध नाही अशा ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहे. या योजनेमुळे वस्तीवरील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच, त्याचबरोबर वस्तीवरील जनावरांचादेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. या योजनांमुळे सोनेवाडी येथील खाड्याची वाडी, कासारवाडी येथील वस्ती व कडाळे वस्ती, खंबाळे येथील भिल्ल वस्ती व बिरोबा वाडी, चास येथील ढोमाची वाडी या सहा वाड्यांमधील ४३३ कुटुंबांना व २१६५ शेळ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी लागणारे आर्थिक सहकार्य नालंदा फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने करण्यात आले तर श्रमदान व बांधकामासाठी लागणारे साहित्य स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पुरविण्यात आले.