शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

लोकसहभाग : वीस गावांमध्ये शेळीपालनावर आधारित कार्यक्रम आदिवासी वस्त्यांमध्ये पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:11 IST

सिन्नर : युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील चास, कासारवाडी, सोनेवाडी व खंबाळे या गावातील सहा आदिवासी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करण्यात आली

ठळक मुद्दे२० गावांमध्ये शेळी पालनावर आधारित महिला उपजीविका विकास कार्यक्रमपिण्याच्या पाण्याची समस्या ही आदिवासी वस्त्यांवर जास्त

सिन्नर : युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील चास, कासारवाडी, सोनेवाडी व खंबाळे या गावातील सहा आदिवासी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करण्यात आली. या योजनांचे उद्घाटन संजय जोशी, संचालक, नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे, संचालक मनीषा पोटे, गावाचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन मुंबई यांच्या सहयोगातून मागील तीन वर्षांपासून सिन्नर तालुक्यामधील २० गावांमध्ये शेळी पालनावर आधारित महिला उपजीविका विकास कार्यक्रम, जमानदी खोरे विकास कार्यक्रम यासारखे ग्रामीण विकासाचे विविध उपक्रम राबवित आहे. सिन्नर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणूनच ओळखला जातो, त्यामुळे शेतीसाठी आणि पिण्यासाठी वर्षातील ४ महिने तालुक्यातील ४६ गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. युवा मित्र संस्थेला काम करत असताना लक्षात आले की, पिण्याच्या पाण्याची समस्या ही आदिवासी वस्त्यांवर जास्त आहे. प्रत्येक बोअरवेल शेजारी ५००० लिटरची पाण्याची टाकी बसवून, पाइपलाइनद्वारे ती भरण्याची व्यवस्था केली. ज्या ठिकाणी लाइटची व्यवस्था आहे तिथे मोटार बसवली व जिथे लाइट उपलब्ध नाही अशा ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहे. या योजनेमुळे वस्तीवरील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच, त्याचबरोबर वस्तीवरील जनावरांचादेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. या योजनांमुळे सोनेवाडी येथील खाड्याची वाडी, कासारवाडी येथील वस्ती व कडाळे वस्ती, खंबाळे येथील भिल्ल वस्ती व बिरोबा वाडी, चास येथील ढोमाची वाडी या सहा वाड्यांमधील ४३३ कुटुंबांना व २१६५ शेळ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी लागणारे आर्थिक सहकार्य नालंदा फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने करण्यात आले तर श्रमदान व बांधकामासाठी लागणारे साहित्य स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पुरविण्यात आले.