शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:40 IST

त्र्यंबकेश्वर येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : त्र्यंबकेश्वरला भेट देऊन केली पाहणी

त्र्यंबकेश्वर : येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन गावात पूर परिस्थिती का उद्भवते याबाबतचा शोध घेण्यासाठी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार सुदेश निरगुडे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते. गावातील पूर परिस्थितीच्या बाबतीत लोकांनी केलेल्या तक्रारींवरून असे दिसते की, नागरिकांनी सहकार्य केल्यास बºयाच तक्र ारी सुटण्यास मदत होईल. कारण नदीपात्रात जिथून पाणी जाते, तेथेच कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होत नाही. तर काही ठिकाणी नदीपात्र लहान आहे, कारण लोकांनीच नदीपात्रात अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत. त्यामुळेही पूर परिस्थिती गंभीर होते. याबाबत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.या ठिकाणांची पाहणीप्रारंभी जिल्हाधिकारी आणि अधिकाºयांनी अहिल्या परिसरात भेट दिली. तेथून ते त्र्यंबकेश्वर मंदिरात आले. आवश्यक सूचना करून नंतर त्यांनी गोदावरी नदीपात्राची पाहणी केली. पथकाने मेनरोडवरील गंगास्लॅबची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी तेथील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे गाºहाणी मांडली.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरfloodपूर