शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: September 9, 2015 00:14 IST

गंगापूर धरण : आवर्तन सोडण्याची मागणी

नाशिक : निफाड व नाशिक तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसा विण्याबरोबरच नष्ट होवू पाहणाऱ्या द्राक्ष बागांसाठी गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे यामागणीसाठी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. गंगापूर धरणात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राखीव असलेल्या पाण्यातून आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते. गंगापूर धरणात सध्या ६८ टक्केपाणी साठा असून, दुसरीकडे निफाड व नाशिक तालुक्यांतील डाव्या कालव्यावरील पिंप्री, चित्तेगाव, ओणे, ओझर, दिक्षी, जिव्हाळे, दात्याने, खेरवाडी, कसबे सुकेणे आदि गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा काढावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच द्राक्षबागाही धोक्यात आल्या असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. या सर्व परिस्थितीशी निफाडचे तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून टंचाईचा अहवाल सादर केलेला आहे, तर गावोगावच्या ग्रामपंचायतींनी तसे ठरावही केला आहे. या संदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन तसेच पाटबंधारे राज्यमंत्री शिवतारे यांना परिस्थितीशी अवगत करण्यात येऊन गंगापूर धरणात सध्या शिल्लक असलेल्या साठ्यातून डाव्या कालव्यात आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर या गंगापूर धरणातून पाणी सोडणे शक्य आहे काय याबाबत पाटबंधारे खात्याकडे विचारणा करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवले असून, त्यातील ११० दशलक्ष घनफूट पाणी आजवर सोडण्यात आले, आणखी दोन पर्वण्या आटोपल्यानंतर उर्वरित पाणी आवर्तन म्हणून सोडण्याचा प्रशासन विचार करीत आहे. (प्रतिनिधी)