शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

शेतकरीवर्ग धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:37 IST

नाशिक : पेरणीनंतर लगेचच मक्याला कवेत घेणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीने आता आपला मोर्चा मका पिकाला लागून असलेल्या पिकांकडे वळविला असून, बाजरीपाठोपाठ आता द्राक्षबागांवरही लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. या अळीच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे कृषी विभाग व शेतकऱ्यांनी हात टेकले असून, वेळीच तिचा उपद्रव रोखला नाही तर जवळपास ८० प्रकारच्या पिकांना अळी विळखा मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे मक्याचे ५० टक्के नुकसान :

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेरणीनंतर लगेचच मक्याला कवेत घेणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीने आता आपला मोर्चा मका पिकाला लागून असलेल्या पिकांकडे वळविला असून, बाजरीपाठोपाठ आता द्राक्षबागांवरही लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. या अळीच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे कृषी विभाग व शेतकऱ्यांनी हात टेकले असून, वेळीच तिचा उपद्रव रोखला नाही तर जवळपास ८० प्रकारच्या पिकांना अळी विळखा मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मूळ अमेरिका त्यानंतर भारतात उत्तराखंडाच्या मार्गाने प्रवेश करणाºया अमेरिकन लष्करी अळीने यंदा खरिपाच्या मक्यावर घाला घातला लष्करी अळीचा बाजरी, द्राक्ष पिकांना वेढाआहे. प्रारंभी स्वीटकॉर्नवर आढळलेली अळी खरिपात सरसकट मक्यावर दिसू लागली असून, जिल्ह्यातील सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरवरील मक्यापैकी एक लाखाहून अधिक हेक्टरवरील पीक सप्टेंबरपर्यंत नष्ट झाले आहे. लागवडीनंतर अवघ्या महिनाभरात मक्यावर ठाण मांडणाºया या लष्करी अळीने प्रारंभी मक्याच्या पानावर घाला घातला व त्यानंतर आता तर थेट मक्याच्या कणसात प्रवेश केल्याने तिचा नायनाट करण्यासाठी शेतकºयांनी वापरलेल्या महागड्या औषधांचाही तिच्यावर परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.ताशी ४५० किलोमीटरच्या वेगाने प्रवास करणाºया लष्करी अळीकडून २२ दिवसांतच अंडी दिली जाते व त्याचे प्रमाणही दोन हजार अंडी एकाच वेळी पिकावर सोडली जात असल्याने तिचा प्रसार व प्रादुर्भाव वेगाने होत आहे. मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडल्यावर मक्यावरील अळीचा प्रादुर्भाव जोराच्या पावसाने कमी होईल, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला होता; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर काही शेतकºयांनी उभ्या मक्याच्या पिकावर रोटर फिरवून दुसºया पिकाची तयारी केली, परंतु पिकावरून मातीत अंडी घातलेल्या लष्करी अळीने दुसºया नवीन पिकालाही लक्ष्य केले आहे. मक्याला वेढा दिल्यानंतर आता लगतच्या शेतातील बाजरी व द्राक्षबागांवरही या अळ्या आढळू लागल्या असून, त्यामुळे काढणीला आलेली बाजरी व छाटणीला आलेल्या द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. झपाट्याने संपूर्ण पीकच कवेत घेणाºया या अळीच्या धास्तीने काही द्राक्षबागायतदारांनी पिकावर चिकट पट्टीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.जेणेकरून द्राक्षबागेच्या शेंड्यावर चढणारी लष्करी अळी चिकटपट्टीला चिकटून तेथेच अडकून पडणार आहे. साधारणत: हंगामपूर्व द्राक्ष घेणाºया पट्ट्यातील शेतकºयांनी या पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली. मक्याच्या चाºयाने जनावरांना त्रासलष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला मका शेतकºयांकडून काढून टाकला जात असून, त्याचा चारा जनावरांना खाण्यासाठी दिला जात आहे. परंतु या चाºयावरही अळीचे वास्तव्य असल्याने चाºयाच्या रूपाने ती जनावरांच्या पोटात जाऊ लागली आहे. त्यामुळे जनावरांचे पोट फुगणे, दूध कमी देणे, सुस्तपणा येणे असे आजार होऊ लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना या गोष्टीची माहिती नसून जनावरांच्या शेणातूनही लष्करी अळीचा प्रादुर्भाव फोफावत चालल्याचे प्रथमदर्शनी दिसू लागले आहे.