शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

देवळा, येवल्यात पैसे अदा : मनमाडला संचालकांची तयारी दोन बाजार समित्यांवर टांगती तलवार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:20 IST

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले.

ठळक मुद्देशेतकºयांचे पैसे परत करण्यासाठी अनामत भरण्याची तयारीव्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले असून, मनमाड बाजार समितीच्या संचालकांनीच शेतकºयांचे पैसे परत करण्यासाठी अनामत भरण्याची तयारी दर्शविली, तथापि, मालेगाव व उमराणे बाजार समित्यांच्या प्रयत्नांना व्यापाºयांकडून दाद मिळत नसल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.या संदर्भात सहकार खात्याने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीवर जूनच्या दुसºया आठवड्यांत सुनावणी होणार आहे. मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापाºयांनी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकºयांकडून मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतकºयांना धनादेश किंवा आरटीजीएस करण्याचे आश्वासन दिले. व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात साधारणत: २० व्यापाºयांनी १४१९ शेतकºयांचे ४ कोटी ९५ लाख रुपये थकविले असून, अशा व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आदेश बाजार समित्यांना देऊनही त्यांनी त्याची दखल न घेता उलट त्यांना अभय दिले. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी व्यापाºयांना परवाने देताना बाजार समित्यांनी कायदा व नियमांना हरताळ फासल्याचा आक्षेप घेत पाचही बाजार समित्यांच्या संचालकांना नोटिसा बजावून त्यांचे संचालकपद रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती व त्यावर संचालकांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी येत्या ११ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या नोटिसीमुळे अडचणीत आलेल्या संचालकांनी ज्या व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे थकविले त्यांचा शोध घेऊन शेतकºयांचे थकीत पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यामुळे येवला व देवळा येथील शेतकºयांचे पैसे व्यापाºयांनी परत केले आहेत, तर मनमाड बाजार समितीच्या संचालकांनी शेतकºयांचे व्यापाºयांकडे थकलेले पैसे परत करण्याची हमी घेत तेव्हढी रक्कम बाजार समितीत अनामत म्हणून जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्यावेळी व्यापाºयांकडून पैसे येतील त्यावेळी संचालक आपली अनामत रक्कम परत घेतील. मात्र मालेगाव व उमराणे या दोन बाजार समितीत अनुक्रमे ८६९ शेतकºयांचे २ कोटी ९६ लाख ७६ हजार व १३५ शेतकºयांचे १ कोटी ३८ लाख थकल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली आहे.