शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

देवळा, येवल्यात पैसे अदा : मनमाडला संचालकांची तयारी दोन बाजार समित्यांवर टांगती तलवार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:20 IST

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले.

ठळक मुद्देशेतकºयांचे पैसे परत करण्यासाठी अनामत भरण्याची तयारीव्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले असून, मनमाड बाजार समितीच्या संचालकांनीच शेतकºयांचे पैसे परत करण्यासाठी अनामत भरण्याची तयारी दर्शविली, तथापि, मालेगाव व उमराणे बाजार समित्यांच्या प्रयत्नांना व्यापाºयांकडून दाद मिळत नसल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.या संदर्भात सहकार खात्याने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीवर जूनच्या दुसºया आठवड्यांत सुनावणी होणार आहे. मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापाºयांनी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकºयांकडून मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतकºयांना धनादेश किंवा आरटीजीएस करण्याचे आश्वासन दिले. व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात साधारणत: २० व्यापाºयांनी १४१९ शेतकºयांचे ४ कोटी ९५ लाख रुपये थकविले असून, अशा व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आदेश बाजार समित्यांना देऊनही त्यांनी त्याची दखल न घेता उलट त्यांना अभय दिले. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी व्यापाºयांना परवाने देताना बाजार समित्यांनी कायदा व नियमांना हरताळ फासल्याचा आक्षेप घेत पाचही बाजार समित्यांच्या संचालकांना नोटिसा बजावून त्यांचे संचालकपद रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती व त्यावर संचालकांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी येत्या ११ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या नोटिसीमुळे अडचणीत आलेल्या संचालकांनी ज्या व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे थकविले त्यांचा शोध घेऊन शेतकºयांचे थकीत पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यामुळे येवला व देवळा येथील शेतकºयांचे पैसे व्यापाºयांनी परत केले आहेत, तर मनमाड बाजार समितीच्या संचालकांनी शेतकºयांचे व्यापाºयांकडे थकलेले पैसे परत करण्याची हमी घेत तेव्हढी रक्कम बाजार समितीत अनामत म्हणून जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्यावेळी व्यापाºयांकडून पैसे येतील त्यावेळी संचालक आपली अनामत रक्कम परत घेतील. मात्र मालेगाव व उमराणे या दोन बाजार समितीत अनुक्रमे ८६९ शेतकºयांचे २ कोटी ९६ लाख ७६ हजार व १३५ शेतकºयांचे १ कोटी ३८ लाख थकल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली आहे.