शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

देवळा, येवल्यात पैसे अदा : मनमाडला संचालकांची तयारी दोन बाजार समित्यांवर टांगती तलवार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:20 IST

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले.

ठळक मुद्देशेतकºयांचे पैसे परत करण्यासाठी अनामत भरण्याची तयारीव्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले असून, मनमाड बाजार समितीच्या संचालकांनीच शेतकºयांचे पैसे परत करण्यासाठी अनामत भरण्याची तयारी दर्शविली, तथापि, मालेगाव व उमराणे बाजार समित्यांच्या प्रयत्नांना व्यापाºयांकडून दाद मिळत नसल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.या संदर्भात सहकार खात्याने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीवर जूनच्या दुसºया आठवड्यांत सुनावणी होणार आहे. मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापाºयांनी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकºयांकडून मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतकºयांना धनादेश किंवा आरटीजीएस करण्याचे आश्वासन दिले. व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात साधारणत: २० व्यापाºयांनी १४१९ शेतकºयांचे ४ कोटी ९५ लाख रुपये थकविले असून, अशा व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आदेश बाजार समित्यांना देऊनही त्यांनी त्याची दखल न घेता उलट त्यांना अभय दिले. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी व्यापाºयांना परवाने देताना बाजार समित्यांनी कायदा व नियमांना हरताळ फासल्याचा आक्षेप घेत पाचही बाजार समित्यांच्या संचालकांना नोटिसा बजावून त्यांचे संचालकपद रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती व त्यावर संचालकांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी येत्या ११ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या नोटिसीमुळे अडचणीत आलेल्या संचालकांनी ज्या व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे थकविले त्यांचा शोध घेऊन शेतकºयांचे थकीत पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यामुळे येवला व देवळा येथील शेतकºयांचे पैसे व्यापाºयांनी परत केले आहेत, तर मनमाड बाजार समितीच्या संचालकांनी शेतकºयांचे व्यापाºयांकडे थकलेले पैसे परत करण्याची हमी घेत तेव्हढी रक्कम बाजार समितीत अनामत म्हणून जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्यावेळी व्यापाºयांकडून पैसे येतील त्यावेळी संचालक आपली अनामत रक्कम परत घेतील. मात्र मालेगाव व उमराणे या दोन बाजार समितीत अनुक्रमे ८६९ शेतकºयांचे २ कोटी ९६ लाख ७६ हजार व १३५ शेतकºयांचे १ कोटी ३८ लाख थकल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली आहे.