शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

हातपंप जर्जर, यंत्रणांना फुटेना पाझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:53 IST

कळवण तालुका : अनेक हातपंप नादुरुस्त, यंत्रणेचे दुर्लक्ष

ठळक मुद्देकळवण तालुक्यात ५५० हातपंप व १३८ जलपऱ्या आहेत.ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेत ४१० हातपंपांचा करार झालेला आहे

मनोज देवरेकळवण : तालुक्याच्या आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, यासाठी तालुक्यातील ठिकठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहे. हातपंप कोणत्या भागात लावायचा? त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात भूगर्भात पाण्याची सुविधा आहे का याची चाचपणी करु नच हातपंप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु पाणी पातळी खालावल्याने या हातपंपाकडे यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरावस्था झाली आहे. हातपंप जर्जर झाले असताना संबंधित यंत्रणांना पाझर फुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.कळवण तालुक्यात ५५० हातपंप व १३८ जलपऱ्या आहेत.ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेत ४१० हातपंपांचा करार झालेला आहे.त्यातील ३९८ पंप चालु असून २० हातपंप पाणीपातळी खालावल्याने बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तर ग्रामपंचायती देखभाल दुरु स्ती करत नसल्याने अनेक हातपंप बंद पडले असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेने सांगितले. उन्हाळ्यात ग्रामीण व आदिवासी भागातील, खेड्यापाड्यातील, वाडयावस्तीवरील सर्वसामान्य नागरीकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी पायपीटही करावी लागते.ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या बहुतांश हातपंपांचीही दुरवस्था झाल्याने तर कुठे पाणी पातळी खालावल्याने २० हातपंप बंद पडले आहेत.मे महिना सुरु झाला असून दिवसेंदिवस दाहकता वाढत आहे.अनेक गावातील पाणीपातळी खालावल्याने पाणीटंचाई जाणवत आहे.कळवण तालुक्यातील काही गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.पाणीटंचाई दुर करण्यासाठी गेल्या काही वर्षात शासनाने टप्प्याटप्प्यात गाव,वाड्या,वस्त्यांवर विंधनविहिरी खोदुन त्यावर हातपंप बसवले आहेत.हे हातपंप सुरवातीच्या काळात योग्य पद्धतीने चालले.मात्र देखभाल दुरु स्तीअभावी अनेक पंप बंद पडले असुन त्यांचा वापर थांबल्याने पंप गंजले,तुटले आहेत

टॅग्स :Nashikनाशिक