शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

मित्रपक्षातील फूट कॉँग्रेसच्या पथ्यावर ?

By admin | Updated: August 4, 2015 23:28 IST

मालेगाव : स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

मालेगाव : येथील महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपद निवडणुकीच्या निमित्ताने मनपातील सत्तारूढ तिसरा महाज व त्यांचा मित्रपक्ष यांच्यात फूट पडली आहे. एवढेच नव्हे तर तिसरा महाजलाही भगदाड पडले आहे.तिसरा महाजनेही विरोधी कॉँग्रेसचा मित्र असलेल्या मालेगाव विकास आघाडीला आपल्या गळाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. सदर निवडणुकीसाठी अर्थपूर्ण घडामोडींनी वेग घेतल्याने कोणाची बोली किती लागते यावर ही निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी हे निश्चित होणार आहे.या निवडणुकीत सर्वप्रथम कॉँग्रेसनेच आघाडी घेतली. मनपातील सत्तारूढ तिसरा महाज - शहर विकास आघाडी व शिवसेना या मित्रपक्षातील नाराजीचा कॉँग्रेसने पुरेपूर फायदा घेतला आहे. महाज व प्रामुख्याने महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांच्या कारभारावर नाराज असलेले उपमहापौर युनूस शेख ईसा यांना कॉँग्रेसने आपल्या गळास लावले. तसेच तिसरा महाजमध्येच सभापतिपदावरून चढाओढ सुरू होती. महाजचे संस्थापक माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांच्यासोबत पक्षाच्या स्थापनेपासून सावलीसारखे असणारे एजाज उमर हेही महाजमधून फुटून कॉँग्रेसच्या गोटात सामील झाले आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी आपण दावेदार असताना आपणास डावलण्यात आले. कठीण प्रसंगी पक्षाशी व माजी आमदाराशी एकनिष्ट असतानादेखील आपल्या पक्षनिष्ठेचे फळ आपणास न मिळता बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात असल्याची उमर यांची नाराजी आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे संख्याबळ आजच आठ झाले आहे. गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने जनता दलाचे केवळ चार नगरसेवक असताना बुलंद एक्बाल यांना विनाशर्त पाठिंबा दर्शविला होता. त्या उपकाराची परतफेड म्हणून जनता दलाने स्थायीत आपणास मदत करावी, अशी कॉँग्रेसची अपेक्षा आहे. मात्र सध्या जनता दलाची भूमिका काठावरची आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेससोबत असणारी मालेगाव विकास आघाडी या निवडणुकीत मात्र विरोधी असलेल्या महाजच्या गोटात सामील झाली आहे. ही महाजसाठी त्यातल्या त्यात समाधानकारक घटना आहे. या सर्वांमध्ये आता शिवसेनेची भूमिका ही निर्णायकी ठरणार आहे. महापौर निवडणुकीत शिवसेनेची तुलनेने ‘स्वस्तातील’ भूमिका ही सर्वात आधी उघड झाली होती. यंदा मात्र शिवसेनेने चतुराई दाखवत आपले पत्ते अजून खुले केलेले नाही. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होते, चिठ्ठी पद्धतीने होते की एकतर्फी होते हे बऱ्याचअंशी शिवसेनेच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. शेवटी स्थायीची निवडणूक ही पक्ष - विचारसरणीपेक्षा ‘विकासाची’ बोली कोण किती लावतो यावरच ठरणार आहे. (प्रतिनिधी)