शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षातील फूट कॉँग्रेसच्या पथ्यावर ?

By admin | Updated: August 4, 2015 23:28 IST

मालेगाव : स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

मालेगाव : येथील महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपद निवडणुकीच्या निमित्ताने मनपातील सत्तारूढ तिसरा महाज व त्यांचा मित्रपक्ष यांच्यात फूट पडली आहे. एवढेच नव्हे तर तिसरा महाजलाही भगदाड पडले आहे.तिसरा महाजनेही विरोधी कॉँग्रेसचा मित्र असलेल्या मालेगाव विकास आघाडीला आपल्या गळाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. सदर निवडणुकीसाठी अर्थपूर्ण घडामोडींनी वेग घेतल्याने कोणाची बोली किती लागते यावर ही निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी हे निश्चित होणार आहे.या निवडणुकीत सर्वप्रथम कॉँग्रेसनेच आघाडी घेतली. मनपातील सत्तारूढ तिसरा महाज - शहर विकास आघाडी व शिवसेना या मित्रपक्षातील नाराजीचा कॉँग्रेसने पुरेपूर फायदा घेतला आहे. महाज व प्रामुख्याने महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांच्या कारभारावर नाराज असलेले उपमहापौर युनूस शेख ईसा यांना कॉँग्रेसने आपल्या गळास लावले. तसेच तिसरा महाजमध्येच सभापतिपदावरून चढाओढ सुरू होती. महाजचे संस्थापक माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांच्यासोबत पक्षाच्या स्थापनेपासून सावलीसारखे असणारे एजाज उमर हेही महाजमधून फुटून कॉँग्रेसच्या गोटात सामील झाले आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी आपण दावेदार असताना आपणास डावलण्यात आले. कठीण प्रसंगी पक्षाशी व माजी आमदाराशी एकनिष्ट असतानादेखील आपल्या पक्षनिष्ठेचे फळ आपणास न मिळता बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात असल्याची उमर यांची नाराजी आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे संख्याबळ आजच आठ झाले आहे. गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने जनता दलाचे केवळ चार नगरसेवक असताना बुलंद एक्बाल यांना विनाशर्त पाठिंबा दर्शविला होता. त्या उपकाराची परतफेड म्हणून जनता दलाने स्थायीत आपणास मदत करावी, अशी कॉँग्रेसची अपेक्षा आहे. मात्र सध्या जनता दलाची भूमिका काठावरची आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेससोबत असणारी मालेगाव विकास आघाडी या निवडणुकीत मात्र विरोधी असलेल्या महाजच्या गोटात सामील झाली आहे. ही महाजसाठी त्यातल्या त्यात समाधानकारक घटना आहे. या सर्वांमध्ये आता शिवसेनेची भूमिका ही निर्णायकी ठरणार आहे. महापौर निवडणुकीत शिवसेनेची तुलनेने ‘स्वस्तातील’ भूमिका ही सर्वात आधी उघड झाली होती. यंदा मात्र शिवसेनेने चतुराई दाखवत आपले पत्ते अजून खुले केलेले नाही. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होते, चिठ्ठी पद्धतीने होते की एकतर्फी होते हे बऱ्याचअंशी शिवसेनेच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. शेवटी स्थायीची निवडणूक ही पक्ष - विचारसरणीपेक्षा ‘विकासाची’ बोली कोण किती लावतो यावरच ठरणार आहे. (प्रतिनिधी)