शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

मित्रपक्षातील फूट कॉँग्रेसच्या पथ्यावर ?

By admin | Updated: August 4, 2015 23:28 IST

मालेगाव : स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

मालेगाव : येथील महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपद निवडणुकीच्या निमित्ताने मनपातील सत्तारूढ तिसरा महाज व त्यांचा मित्रपक्ष यांच्यात फूट पडली आहे. एवढेच नव्हे तर तिसरा महाजलाही भगदाड पडले आहे.तिसरा महाजनेही विरोधी कॉँग्रेसचा मित्र असलेल्या मालेगाव विकास आघाडीला आपल्या गळाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. सदर निवडणुकीसाठी अर्थपूर्ण घडामोडींनी वेग घेतल्याने कोणाची बोली किती लागते यावर ही निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी हे निश्चित होणार आहे.या निवडणुकीत सर्वप्रथम कॉँग्रेसनेच आघाडी घेतली. मनपातील सत्तारूढ तिसरा महाज - शहर विकास आघाडी व शिवसेना या मित्रपक्षातील नाराजीचा कॉँग्रेसने पुरेपूर फायदा घेतला आहे. महाज व प्रामुख्याने महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांच्या कारभारावर नाराज असलेले उपमहापौर युनूस शेख ईसा यांना कॉँग्रेसने आपल्या गळास लावले. तसेच तिसरा महाजमध्येच सभापतिपदावरून चढाओढ सुरू होती. महाजचे संस्थापक माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांच्यासोबत पक्षाच्या स्थापनेपासून सावलीसारखे असणारे एजाज उमर हेही महाजमधून फुटून कॉँग्रेसच्या गोटात सामील झाले आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी आपण दावेदार असताना आपणास डावलण्यात आले. कठीण प्रसंगी पक्षाशी व माजी आमदाराशी एकनिष्ट असतानादेखील आपल्या पक्षनिष्ठेचे फळ आपणास न मिळता बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात असल्याची उमर यांची नाराजी आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे संख्याबळ आजच आठ झाले आहे. गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने जनता दलाचे केवळ चार नगरसेवक असताना बुलंद एक्बाल यांना विनाशर्त पाठिंबा दर्शविला होता. त्या उपकाराची परतफेड म्हणून जनता दलाने स्थायीत आपणास मदत करावी, अशी कॉँग्रेसची अपेक्षा आहे. मात्र सध्या जनता दलाची भूमिका काठावरची आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेससोबत असणारी मालेगाव विकास आघाडी या निवडणुकीत मात्र विरोधी असलेल्या महाजच्या गोटात सामील झाली आहे. ही महाजसाठी त्यातल्या त्यात समाधानकारक घटना आहे. या सर्वांमध्ये आता शिवसेनेची भूमिका ही निर्णायकी ठरणार आहे. महापौर निवडणुकीत शिवसेनेची तुलनेने ‘स्वस्तातील’ भूमिका ही सर्वात आधी उघड झाली होती. यंदा मात्र शिवसेनेने चतुराई दाखवत आपले पत्ते अजून खुले केलेले नाही. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होते, चिठ्ठी पद्धतीने होते की एकतर्फी होते हे बऱ्याचअंशी शिवसेनेच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. शेवटी स्थायीची निवडणूक ही पक्ष - विचारसरणीपेक्षा ‘विकासाची’ बोली कोण किती लावतो यावरच ठरणार आहे. (प्रतिनिधी)