शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पेन्शनसाठी अर्धवेळ ग्रंथपालांची सेवा ग्राह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:31 IST

पेन्शनसाठी १ नोव्हेंबर २००५ नंतरची पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून नियुक्ती असलेल्या याचिकाकर्त्यांची पूर्वीची अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून केलेली सेवा ग्राह्य धरीत संबंधित याचिकाकर्त्यास आठ आठवड्यांच्या आत पेन्शनचा लाभ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत. त्यामुळे अर्धवेळ ग्रंथपालांच्या अपेक्षा उंचावल्या असून, त्यांची अर्धवेळ सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरली जाण्याचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला असून, ग्रंथालय शिक्षक परिषदेने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ठळक मुद्देअपेक्षा उंचावल्या : उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

नाशिक : पेन्शनसाठी १ नोव्हेंबर २००५ नंतरची पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून नियुक्ती असलेल्या याचिकाकर्त्यांची पूर्वीची अर्धवेळ ग्रंथपाल म्हणूनकेलेली सेवा ग्राह्य धरीत संबंधित याचिकाकर्त्यास आठ आठवड्यांच्या आत पेन्शनचा लाभ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत. त्यामुळे अर्धवेळ ग्रंथपालांच्या अपेक्षा उंचावल्या असून, त्यांची अर्धवेळ सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरली जाण्याचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला असून, ग्रंथालय शिक्षक परिषदेने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.नाशिकमधील प्रेमा हेरकल यांनी १९९१ ते २००५ या काळात अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून सेवा केल्यानंतर नोव्हेंबर २००६ मध्ये रिक्त पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर त्यांंना नियुक्ती मिळाली. त्यानंर २०१५ मध्ये सेवारत राहिल्यानंतर त्या निवृत्त झाल्या. परंतु, पूर्णवेळ झाल्यानंतरही त्यांचे नवीन पेन्शन योजनेचे खाते उघडलेले नव्हते. अशा स्थितीत सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तिवेतनाचा प्रस्ताव शाळेने जिल्हा परिषदेमार्फत लेखा महासंचालक मुंबई यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला असता संबंधित कार्यालयाने १ नोव्हेंबर २००५ नंतरची पूर्णवेळ नियुक्ती असल्यामुळे सेवानिवृत्तिवेतनाचा लाभ नाकारून प्रस्ताव परत पाठवला. त्यामुळे हेरकल यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सेवानिवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्यासाठी अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून केलेली सेवा ग्राह्य धरून पेन्शनचा लाभ मिळावा, अशी मागणी करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात बुधवारी (दि.११) मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत हेरकल यांची याचिका मान्य करून अर्धवेळ ग्रंथपाल पदावरची सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरून त्यांना आठ आठवड्यांच्या आत पेन्शनचा लाभ देणेबाबतचे आदेश शासनाला दिले आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर कोणताही लाभ न मिळालेल्या हेरकल यांना सेवानिवृत्तिवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अर्धवेळची सेवा ग्राह्य धरून पेन्शनचा लाभ मिळाल्याबद्दल ग्रंथालय शिक्षक परिषदेने न्यायाल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वी नागपूर खंडपीठाने रागिणी गायकवाड यांनाही अशाच प्रकारचा लाभ दिलेला असून, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्चना शेलार व आसावरी चव्हाण या ग्रंथपालांची अर्धवेळ सेवाही पेन्शनसाठी ग्राह्य धरण्यात आल्याची माहिती ग्रंथालय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विलास सोनार यांनी दिली आहे. या निर्णयामुळे अर्धवेळ गं्रथपालांच्या अपेक्षा उंचावल्या असून, त्यांची सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरली जाण्याचा विश्वास अर्धवेळ ग्रंथपालांमध्ये निर्माण झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली आहे.

टॅग्स :NashikनाशिकlibraryवाचनालयHigh Courtउच्च न्यायालय