शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

संसद ग्राम दत्तक योजना : दिंडोरीच्या उद्योजकांना बजावणार नोटिसा

By admin | Updated: June 10, 2015 22:59 IST

समाजसेवेचा खासदार मागणार ‘हिशेब’

 नाशिक : शासनाच्या निर्णयानुसार उद्योजकांनी त्यांच्या नफ्यातील दोेन टक्के रक्कम स्थानिक क्षेत्रातील विकासकामांसाठी वापरणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात त्याचा समाजहितासाठी व समाजसेवेसाठी उद्योजकांनी किती वापर केला याचा हिशेब मागण्याचा निर्णय दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून दिंडोरी तालुक्यातील शंभरहून अधिक खासगी कंपन्यांच्या मालकांना नोेटिसा बजावण्याची सूचना त्यांनी प्रांत यांना केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन ते आदर्श करण्यासाठी संसद ग्राम दत्तक योजना राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी अंजनेरी, तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अवनखेड गाव दत्तक घेतले आहे. बुधवारी (दि. १०) या दत्तक घेतलेल्या गावाच्या विकासासंदर्भात आवश्यक ते नियोजन व सूचना मागविण्यासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी पंचायत समितीत एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस तालुक्यातील शंभरहून अधिक कंपन्यांच्या मालकांना व उद्योजकांनाही उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले होते. प्रत्यक्षात या बैठकीसाठी बोटावर मोजण्याइतपत सात ते आठच उद्योजक हजर होते. त्यातही जे उपस्थित होते त्यांनी आमच्याकडून आधीच महापुरुषांच्या जयंतीसाठी ‘वर्गणी’ गोळा केली जात असल्याचे गाऱ्हाणे मांडले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अवनखेड गावच्या विकासाबाबत आपल्या काही कल्पना किंवा सूचना असतील तर त्या मांडण्यासाठी तसेच समाजासाठी काहीतरी योगदान देण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपल्याला येथे बोलावल्याचे खडे बोल या उद्योजकांना सुनावल्याचे कळते. तसेच प्रांत भोगे यांना बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या सर्व उद्योजकांना नोटिसा बजावण्याची सूचना केली. बैठकीस पंचायत समितीच्या सभापती अलका चौधरी, जि. प. सदस्य मनीषा बोडके, प्रभारी तहसीलदार कनोजे, गटविकास अधिकारी कराड यांच्यासह पंचायत समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

शासनाच्या निर्णयानुसार कंपन्यांना व उद्योजकांना स्थानिक परिसराचा विकास व समाजसेवेसाठी त्यांच्या एकूण नफ्यातील दोन टक्के रक्कम खर्च करावी लागते. गेल्या पाच वर्षांत दिंडोरी तालुक्यातील किती कंपन्यांनी अशी रक्कम खर्च केली याची माहिती मागविण्यासाठी उद्योजकांना नोटिसा बजावण्याची सूचना आपण प्रांत यांना केली आहे. समाजासाठी काहीतरी देणे लागतो याचाही विचार उद्योजक करण्यास विसरू लागले आहेत.- हरिश्चंद्र चव्हाण, खासदार