शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

पालक सचिवांचा शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:45 IST

सिन्नर/गुळवंच : सिन्नर तालुक्याची दुष्काळी परिस्थिती व त्यावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दौरा केला. गुळवंच येथील चारा छावणीला भेट देण्यासह जलयुक्तच्या व पानी फाऊंडेशनच्या कामांची पाहणी पालक सचिवांनी केली. गुळवंच येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतला. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जनावरांच्या छावणीला मुदतवाढ देण्याबाबतचा अहवालावर त्यांनी सकारत्मकता दर्शविली.

ठळक मुद्दे सिन्नरला दुष्काळ पाहणी दौरा : गुळवंच येथील चारा छावण्यांची पाहणी; जाणून घेतल्या समस्या

सिन्नर/गुळवंच : सिन्नर तालुक्याची दुष्काळी परिस्थिती व त्यावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दौरा केला. गुळवंच येथील चारा छावणीला भेट देण्यासह जलयुक्तच्या व पानी फाऊंडेशनच्या कामांची पाहणी पालक सचिवांनी केली. गुळवंच येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतला. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जनावरांच्या छावणीला मुदतवाढ देण्याबाबतचा अहवालावर त्यांनी सकारत्मकता दर्शविली.पालक सचिव सीताराम कुंटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, अर्जून श्रीनिवास, जिल्हा कृषी अधीक्षक एस. जी. पडवळ, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, कृषी अधिकारी गोकुळ वाघ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विसावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गर्जे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब घागरे, यांच्यासह कृषी, रोजगार हमी, महसूल, पंचायत समितीचेअधिकारी यांच्यासह तालुक्यात दौरा केला.गुळवंच येथील छावणीत शेतकºयांनी शेतकºयांनी जनावरांना मुबलक पाणी-चारा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणीकेली.त्याचबरोबर प्रत्येक जनावरांना देण्यात येणाºया अनुदानात वाढ करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कुंटे यांनी जनावरांना दहा रूपयांची वाढ करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच परिसरातून दुपारी दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात जनावरे या छावणीत दाखल होत असल्याचे कुंटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खोपडी येथील दराडे यांच्या समवेत संवाद साधत जेवन कुठून येणार? दुभती जनावरे किती राहण्याची सोय काय अशी चौकशी करत छावणी धारकांना याबाबत लक्ष देण्याची सूचना केली.दराडे हे दहा जनावरांसह येथे स्वत: मुक्काम करणार आहे. छावणी चालकांना वेळेत पैसे द्या अशी सूचना संबंधित अधिकाºयांना करण्यात आल्या. यावेळी विष्णू सानप, अर्जुन आव्हाड, भगवान सानप, प्रकाश सानप सरपंच कविता सानप, उपसरपंच सुनिता कांगणे, भाऊदास सिरसाठ, केशव कांगणे, संतोष कांगणे, अनिल कानडे आदि उपस्थित होते.कुंदेवाडी, डुबेरे व आशापूर येथे भेटजिल्हा पालक सचिव कुंटे यांनी कुंदेवाडी येथे गाळमुक्त धरण अभियान कामाची पाहणी केली. गाळ काढणे व दुरुस्तीच्या कामाची माहिती त्यांनी घेतली. डुबेरे येथील फळबागेला भेट देत कमी पाण्यात फळबाग वाचविण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती घेतली. आशापूर येथे पानी फाऊंडेशनच्या श्रमदानाची माहिती कुंटे यांनी घेतली. वाजे यांचे निवेदनपालक सचिव कुंटे यांची डुबेरे येथे आमदार राजाभाऊ वाजे यांच्याशी भेट झाली. यावेळी वाजे यांनी तालुक्यातील टंचाईची स्थिती सांगून दुष्काळी उपाययोजनांच्या मागण्यांचे निवेदन दिले. विधानसभेत दोन वर्षांपूर्वी जनावरांसाठी पाणी, प्रतिमाणसी देण्यात येणारे पाणी, जनावरांना देण्यात येणारा अपुरा असून निकष बदलण्याची मागणी केली होती असे सांगितले. तथापि, अद्यापही निर्णय झाला नाही़रजिस्टरची पाहणीपालकसचिव कुंटे यांनी गुळवंच येथे ग्रामपंचायतीत असलेल्या टॅँकरचे रजिस्टर पाहून खातरजमा केली. टॅँकरच्या फेºयांची माहिती जाणून घेण्यासह टंचाईच्या स्थितीचा आढावा त्यांनी घेतला. याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली़पालक सचिवांचा पीकअप जीपमधून प्रवासपालक सचिव सीतारा कुंटे यांनी आशापूर (टेंभूरवाडी) येथे पानी फाऊंडेशनचे श्रमदानातून करण्यात येणारे काम पाहिले. भर उन्हात शासकीय वाहने कामाची ठिकाणी जात नसल्याने पीकअप जीपमधून पुढील प्रवास करण्याचा निर्णय कुंटे यांनी घेतला. भर उन्हात उघड्या पीकअप जीपमधून डोक्यावर उपरणे बांधून कुंटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी कामाचे ठिकाण गाठून पाहणी केली.