शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

पालक संमतीचा नियम शिक्षण बाजारीकरणाविरोधी आंदोलनास खीळ ठरेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:14 IST

शैक्षणिक संस्थांनी प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शाळेतील शिक्षक आणि पालक यांच्या माध्यमातून शिक्षक व पालक यांची एकत्रित अशी ...

शैक्षणिक संस्थांनी प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शाळेतील शिक्षक आणि पालक यांच्या माध्यमातून शिक्षक व पालक यांची एकत्रित अशी पालक शिक्षक संघाची ‘कार्यकारी समिती’ तयार करून या समितीने व शाळा प्रशासनाने फीसंदर्भात आपापसात प्रस्ताव देऊन फी ठरवावी. तसेच शाळा प्रशासन पालक-शिक्षक कार्यकारी समितीस शाळेचा सर्व जमा-खर्च, बिले सादर करावी, या सर्व बैठकीची व्हिडिओ शूटिंग सुद्धा करावे अशी तरतूद असतानाही शाळांकडून व्यवस्थापनाच्या मर्जीतील पालकांचाच अशा समितीत समावेश होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याच नाही असेही नाही. अशा परिस्थिती मागील वर्षात संपूर्ण वर्षभर कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होऊच शकल्या नाहीत. अशा परिस्थितीत अशा समित्या फारशा सक्रिय झालेल्या कधीच झालेल्या दिसल्या नाही. उलट शाळांनी संपूर्ण शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांना वारंवार वेठीस धरीत गुणपत्रिका रोखणे, परीक्षांना बसू ने देणे, विद्यार्थ्यांचे ऑनलान शिक्षण बंद केल्याच्या घटना वारंवार समोर येत राहिल्या. काही शाळांनी तर चक्क आर्थिक संकटातील पालकांना कर्ज देणाऱ्या कंपन्यांचे पर्यायही सुचविल्याचे प्रकार समोर आले. या घटनांमुळे शिक्षणाच्या बाजारीकरणात पालकांना कोणी वालीच उरला नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने काही संघटनांनी पालकांच्या मदतीला धाव घेत या प्रश्नाला हात घातल्याने शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधी लढा उभा राहण्याच्या भीतीतून, तर २५ टक्के पालकांच्या संमतीची तरतूद केली नसावी ना, अशी साशंकता निर्माण होण्यास जागा निश्चितच आहे. तसेही एकाच शाळेतील २५ टक्के पालकांची आर्थिक परिस्थिती खालवण्याची तशीही फारशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे ते एकत्रित शुल्क नियंत्रणासाठी तक्रार करू शकतील का हाही एक प्रश्नच आहे.

- नामदेव भोर

----

शैक्षणिक शुल्कची ५० टक्के रक्कम भरणाऱ्या अथवा पहिला हप्ता भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाच तक्रार करता येणार आहे. जे पालक नियमित शुल्काच हप्ता किंवा ५० टक्के शुल्क भरू शकतात असे पालक उर्वरित ५० टक्क्यांसाठी शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रारीचा खर्च आणि वेळ तरी वाया का घालवतील असाही प्र्श्न आहेच. त्यामुळे एकाकी पडलेल्या पालकाला बाह्य घटकांची मदत घेतल्याशिवाय अन्य पर्यायच उरत नाही. परंतु, शिक्षण विभागाने पालकांच्या याच असंघटितपणाचा फायदा घेत शाळांना शुल्क वसुलीची एकप्रकारे मोकळीक दिली अशी आहे.