शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:28 IST

पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांना झोडपून काढणाºया परतीच्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून, शासनस्तरावरून यासंदर्भात थेट आदेश प्राप्त झाले नसले तरी, ज्या ज्याठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गुरुवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व मुल्हेर येथे अनुक्रमे ७७ व ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांना झोडपून काढणाºया परतीच्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून, शासनस्तरावरून यासंदर्भात थेट आदेश प्राप्त झाले नसले तरी, ज्या ज्याठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गुरुवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व मुल्हेर येथे अनुक्रमे ७७ व ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.परतीच्या पावसाने सलग पाच दिवस धुमाकूळ घातल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले असून, द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, तर सोयाबीन व तूर नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. कापणीला आलेला व कापणी करून ठेवलेल्या मक्याला पुन्हा तुरे फुटू लागले तर बाजरीच्या बाबतीतही तोच प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याचे पीक पावसामुळे जमीनदोस्त होण्याची भीती आहे, भाजीपाल्याचीही हीच परिस्थिती असून, शेतकºयांना पाऊस नकोसा झालेला असताना गुरुवारी जिल्ह्यात २२५ मिलीमीटर, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील नाशिक, निफाड, नादंगाव, मालेगाव या चार तालुक्यांत ४२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत असले तरी, शासनाने अद्याप त्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु अतिवृष्टी झाल्यास पीक पंचनामा करण्याची तरतूद असल्यामुळे प्रशासनाने तलाठ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. अतिवृष्टी न झालेल्या भागातही शेती पिकांचे नुकसान होत असल्याने याठिकाणीही पाहणी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.