शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:28 IST

पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांना झोडपून काढणाºया परतीच्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून, शासनस्तरावरून यासंदर्भात थेट आदेश प्राप्त झाले नसले तरी, ज्या ज्याठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गुरुवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व मुल्हेर येथे अनुक्रमे ७७ व ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांना झोडपून काढणाºया परतीच्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून, शासनस्तरावरून यासंदर्भात थेट आदेश प्राप्त झाले नसले तरी, ज्या ज्याठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गुरुवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व मुल्हेर येथे अनुक्रमे ७७ व ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.परतीच्या पावसाने सलग पाच दिवस धुमाकूळ घातल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले असून, द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, तर सोयाबीन व तूर नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. कापणीला आलेला व कापणी करून ठेवलेल्या मक्याला पुन्हा तुरे फुटू लागले तर बाजरीच्या बाबतीतही तोच प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याचे पीक पावसामुळे जमीनदोस्त होण्याची भीती आहे, भाजीपाल्याचीही हीच परिस्थिती असून, शेतकºयांना पाऊस नकोसा झालेला असताना गुरुवारी जिल्ह्यात २२५ मिलीमीटर, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील नाशिक, निफाड, नादंगाव, मालेगाव या चार तालुक्यांत ४२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत असले तरी, शासनाने अद्याप त्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु अतिवृष्टी झाल्यास पीक पंचनामा करण्याची तरतूद असल्यामुळे प्रशासनाने तलाठ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. अतिवृष्टी न झालेल्या भागातही शेती पिकांचे नुकसान होत असल्याने याठिकाणीही पाहणी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.