शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
2
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
3
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
4
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
5
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
6
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
7
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
8
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
9
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
10
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
11
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
12
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
13
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
14
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
15
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
16
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
17
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
18
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
19
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
20
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड डावा कालवा पाण्याच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:07 IST

पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच विहिरी उपसायला लागल्या आहेत. रब्बीतील उन्हाळ कांदा, लाल कांदा, गहु, हरभरा या पिकांना पाणी भरण्यासाठी अडचण भासत आहे.

ठळक मुद्देयेवला : विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांना कांदे वाचवण्याची चिंता

पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच विहिरी उपसायला लागल्या आहेत. रब्बीतील उन्हाळ कांदा, लाल कांदा, गहु, हरभरा या पिकांना पाणी भरण्यासाठी अडचण भासत आहे.           अजून ब-याच शेतकऱ्यांचे पोळ कांद्यासाठी दोन पाणी भरण्याची आवश्यकता आहे. परंतु विहिरींचे फक्त दिवसभरातुन दोन तासच पाणी पुरवत असुन शेतकऱ्यांनी गहू, हरभरा,कांदा आदी पिके शेतात असल्याने पिकांना होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन या परिसरातील ब-याच शेतकऱ्यांनी रोपे विकून टाकली आहेत.या भागात रांगडा व उन्हाळ कांदा लागवडीला जास्त पसंती असते.म्हणून तुरळक शेतकऱ्यांची शेततळी असल्याने पिकांना पाण्यासाठी आश्रय घेतांना दिसत आहे. अशेच शेतकरी कांदा लागवड करतांना दिसत आहेत.अजून काही दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापासुनच पिकांना काटकसरीने पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.आवकाळी पाऊसाने शेतातील रोपे खराब झाली होती. म्हणून शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केली होती, मात्र आता विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पेरलेला कांदा रोपे विक्री करतांनाही शेतकरी दिसुन येतात. म्हणून या परिसरातील जमीनीचे क्षेत्र हे पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर अवलंबून असल्याने शेतकरी पाणी केव्हा येणार या प्रतिक्षेत असुन लवकरात लवकर पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनाकडुन होत आहे.प्रतिक्रिया -यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने मी विहिरीच्या भरवशावर कांदा लागवड केली होती. मात्र अचानक विहिरींने तळ गाठल्याने ते कांदे दोन दिवस ऊन्हात पडलेले होते.तसेच परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याने पालखेड डाव्या कालव्याच्या प्रतिक्षेत आहे- भाऊसाहेब रसाळ, शेतकरी, पिंपळगाव लेप. 

टॅग्स :water shortageपाणीकपातtalukaतालुका