शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पालखेड डावा कालवा पाण्याच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:07 IST

पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच विहिरी उपसायला लागल्या आहेत. रब्बीतील उन्हाळ कांदा, लाल कांदा, गहु, हरभरा या पिकांना पाणी भरण्यासाठी अडचण भासत आहे.

ठळक मुद्देयेवला : विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांना कांदे वाचवण्याची चिंता

पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच विहिरी उपसायला लागल्या आहेत. रब्बीतील उन्हाळ कांदा, लाल कांदा, गहु, हरभरा या पिकांना पाणी भरण्यासाठी अडचण भासत आहे.           अजून ब-याच शेतकऱ्यांचे पोळ कांद्यासाठी दोन पाणी भरण्याची आवश्यकता आहे. परंतु विहिरींचे फक्त दिवसभरातुन दोन तासच पाणी पुरवत असुन शेतकऱ्यांनी गहू, हरभरा,कांदा आदी पिके शेतात असल्याने पिकांना होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन या परिसरातील ब-याच शेतकऱ्यांनी रोपे विकून टाकली आहेत.या भागात रांगडा व उन्हाळ कांदा लागवडीला जास्त पसंती असते.म्हणून तुरळक शेतकऱ्यांची शेततळी असल्याने पिकांना पाण्यासाठी आश्रय घेतांना दिसत आहे. अशेच शेतकरी कांदा लागवड करतांना दिसत आहेत.अजून काही दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापासुनच पिकांना काटकसरीने पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.आवकाळी पाऊसाने शेतातील रोपे खराब झाली होती. म्हणून शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केली होती, मात्र आता विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पेरलेला कांदा रोपे विक्री करतांनाही शेतकरी दिसुन येतात. म्हणून या परिसरातील जमीनीचे क्षेत्र हे पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर अवलंबून असल्याने शेतकरी पाणी केव्हा येणार या प्रतिक्षेत असुन लवकरात लवकर पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनाकडुन होत आहे.प्रतिक्रिया -यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने मी विहिरीच्या भरवशावर कांदा लागवड केली होती. मात्र अचानक विहिरींने तळ गाठल्याने ते कांदे दोन दिवस ऊन्हात पडलेले होते.तसेच परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याने पालखेड डाव्या कालव्याच्या प्रतिक्षेत आहे- भाऊसाहेब रसाळ, शेतकरी, पिंपळगाव लेप. 

टॅग्स :water shortageपाणीकपातtalukaतालुका