शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

पाकिस्तानी विनाशबुद्धी भारतासह जगासाठी घातक : शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:01 IST

पाकिस्तानची निर्मितीच विनाश बुद्धीतून झाली आहे. भारताच्या फाळणीपासूनच पाकिस्तानने विकासात्मक प्रगतीच्या दिशेने वाटचाल न करता विनाशकारी मानसिकतेतून सातत्याने भारतविरोधी कारवायांना प्राधान्य दिले.

नाशिक : पाकिस्तानची निर्मितीच विनाश बुद्धीतून झाली आहे. भारताच्या फाळणीपासूनच पाकिस्तानने विकासात्मक प्रगतीच्या दिशेने वाटचाल न करता विनाशकारी मानसिकतेतून सातत्याने भारतविरोधी कारवायांना प्राधान्य दिले. त्यामुळे पाकिस्तान स्वत:च प्रगतीपासून दूर राहिला असून, भारताच्याही प्रगतीच्या मार्गावर वारंवार अडचण निर्माण करण्याचा प्रयन्न त्याच्याकडून सुरू आहे. याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम संपूर्ण जगावर होत असून, पाकिस्तानची विनाश बुद्धी ही भारतासह संपूर्ण जगासाठी घातक असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय नाशिक व लेट्स टॉक यांच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.११) डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे लिखित ‘पाकिस्तान विनाशाकडून विनाशाकडे’ पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त ब्रिगेडियर जगदीशचंद्र बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्याख्यानात त्यांनी, भारत पाकिस्तानच्या फाळणीची पार्श्वभूमी आणि तत्कालीन सरकारच्या भूमिके वर प्रकाशझोत टाकताना तत्कालीन भारतीय नेत्यांनी कच खाल्ल्यामुळेच पाकिस्तानची फाळणी झाल्याचा आरोप यावेळी केला. तर डॉ. परीक्षित शेवडे यांनीही, पाकिस्तानात शाळेतूनच विनाशकारी शिक्षण दिले जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, फाळणीनंतर पाकिस्तानने वारंवार भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश मिळाले नाही. यश मिळत नसल्याने आता त्यांनी भारताच्या विरोधात प्रॉक्सीवार सुरू केले असून, त्यातूनच भारतात दहशतवादी हल्ले होत आहेत. शालेय शिक्षणातूनच विनाशकारी शिकविण दिली जात असल्याने पाकिस्तानच्या पुढील पिढ्याही विनाशकारी विचार करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन, सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव धर्माजी बोडके, सहायक सचिव अ‍ॅड. अभिजित बगदे, वस्तुसंग्रहालयाचे उदयकुमार मुंगी उपस्थित होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNashikनाशिक