शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

संत निवृत्तीनाथांनी विसावा घेतलेल्या स्थळी पादुका मंदीर साकारणार : रामनाथ बोडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:53 IST

त्र्यंबकेश्वर : सातशे वर्षापुर्वी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भुमीत प्रवेश करण्यापुर्वी तळवाडे शिवारातील तुपादेवी फाटा येथे संत निवृत्तीनाथांनी जेथे विश्रांती घेतली होती. त्या ठिकाणी आजही त्यांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी भारतीय वारकरी महासंघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे यांनी पादुका मंदीर उभारण्याचा संकल्प संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी यात्रेच्या पार्श्वभूमीवर केला आहे. यानिमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज पादुका न्यासची स्थापना करण्यात आली असुन पादुका मंदीर न्यासचे संस्थापकअध्यक्ष रामनाथ पाटील बोडके यांनी हे पादुका मंदीर साकारणार असुन या ठिकाणचा कायापालट लवकरच होणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देसंत निवृत्तीनाथ महाराज यांनी एक दिवस मुक्काम केला होता म्हणुन या ठिकाणी पादुका उभारल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर : सातशे वर्षापुर्वी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भुमीत प्रवेश करण्यापुर्वी तळवाडे शिवारातील तुपादेवी फाटा येथे संत निवृत्तीनाथांनी जेथे विश्रांती घेतली होती. त्या ठिकाणी आजही त्यांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी भारतीय वारकरी महासंघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे यांनी पादुका मंदीर उभारण्याचा संकल्प संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी यात्रेच्या पार्श्वभूमीवर केला आहे. यानिमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज पादुका न्यासची स्थापना करण्यात आली असुन पादुका मंदीर न्यासचे संस्थापकअध्यक्ष रामनाथ पाटील बोडके यांनी हे पादुका मंदीर साकारणार असुन या ठिकाणचा कायापालट लवकरच होणार असल्याचे सांगितले.संत निवृत्तीनाथ महाराज यांची व कुटुंबियांची ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करतांना विधिलिखितानुसार ताटातूट झाल्यानंतर निवृत्तीनाथ वगळता अन्य सारे कुटुंब नेवासा येथे स्वगृही परतले. पण निवृत्तीनाथ महाराज मात्र गंगाद्वारच्या गुरु गहिनीनाथांच्या गुहेत गुरु गहिनीनाथांचा अनुग्रह घेउन गुरु गहिनीनाथांची सेवा करत होते. ही सेवा पुर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथ पुनश्च आपल्या कुटुंबियांकडे गावी परतले. तेथे गेल्यावर त्यांना कळाले की आपले आईवडील गेले. हे चार भावंडे वडिलांनी केलेल्या कथित पापाचे प्रायश्चित्त त्यांच्या आईवडिलांनी तर घेतलेच पण या चार बाळांना शुध्दीपत्र मिळविण्यासाठी पैठण आदी ठिकाणी गेले, पण शुध्दीपत्र मिळाले नाही. पण या दिव्य भावंडांनी असे काही चमत्कार केले की पुढे त्यांना शुध्दीपत्राचीही गरज भासली नाही. निवृत्तीनाथ महाराज हेच ज्ञानदेवाचे गुरु होत. त्यांनी ज्ञानदेवास श्रीमद‌् भगवतगीता सरळ सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी म्हणून सांगण्याची आज्ञा केली. पुढे ज्ञानेश्वरांनी गुरुआज्ञेने ज्ञानेश्वरी लिहीली. स्वतः भागवत धर्माची मुहूर्तमेढ रोवली. वारकरी सांप्रदायाची स्थापना केली. नाथ सांप्रदाय वारक-यांना सांगितला. शेवटी त्यांना वाटले आपले अवतार कार्य संपले आहे, असे वाटुन ते त्र्यंबकेश्वर येथे आपल्या गुरूस्थानी पायथ्याशी संजीवन समाधी घेण्यासाठी परत त्र्यंबकेश्वर येथे येत असतांना अतिशय थकवा वाटल्याने त्यांनी एक दिवस त्र्यंबकेश्वरच्या सिमेवर तळवाडे शिवारात मुक्काम केला.दुस-या दिवशी ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या पायथ्याशी संजीवन समाधी घेउन ते समाधिस्त झाले.त्यांनी आदल्या दिवशी विश्रांती घेतलेली हीच ती जागा होय ! येथे अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कार्यकाळात संत निवृत्तीनाथ महाराज यांनी एक दिवस मुक्काम केला होता म्हणुन या ठिकाणी पादुका उभारल्या आहेत. त्या आजही आहेत. आता या पादुकांचे संरक्षण उन-पावसापासुन व्हावे म्हणून येथे पादुका मंदीर साकारणार आहे. दरम्यान यापुढे त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यात्रेसाठी येणा-या पायी दिंड्या पहिल्य पासुन काही वेळ विसावतात. आणि यापुढेही येथे विसावतील अशा पध्दतीने येथे सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती रामनाथ बोडके यांनी दिली.दरम्यान शिवाजी कसबे, रामनाथ पाटील बोडके, पुरुषोत्तम लोहगावकर, सागर उजे, स्वप्निल शेलार, भुषण अडसरे, रविंद्र सोनवणे आदींनी भुमिपुजन व पादुका पूजन केले.या कार्यक्रम प्रसंगी विलास जगताप, पिंटु बोडके, माजी उपसरपंच रोहिदास बोडके, उपसरपंच संतोष बोडके, तानाजी कड, वामन बोडके, कोंडाजी आहेर, काशिनाथ बोडके, भाऊसाहेब बोडके, रामदास बोडके, बाळु बोडके आदी उपस्थित होते. (पादूकांचा फोटो मागवून बातमी घ्यावा)

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर