शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

सवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:24 IST

नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देत असून, तेथे मिळणाºया संपुटामुळे अनेकांचे उद्योगदेखील सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.

ठळक मुद्देसवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण

संजय पाठक ।नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देत असून, तेथे मिळणाºया संपुटामुळे अनेकांचे उद्योगदेखील सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.नागपूरसह विदर्भाच्या विकासाला विरोध नाही, परंतु अशाप्रकारचा उद्योग पळवण्याचे प्रकार सुरू झाल्याने अनेक जाणकारांना आता वेगळ्या विदर्भाचा वासही येऊ लागला आहे.उत्तर महाराष्टÑाची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यात हवा, पाणी आणि दळणवळण यामुळे उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याचे मानले जाते. सुवर्ण त्रिकोणातील शहरामुळे मुंबई आणि पुण्यानंतर नाशिकचे नाव घेतले जात असले तरी गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये नवीन उद्योग आलेला नाही. विशेषत: औद्योगिक क्षेत्र उपलब्ध नसल्याने मोठी अडचण व्यक्त केली जाते. सिन्नरचा सेझ रखडला आहे आणि तेथे निर्यातक्षम उद्योगांनाच सवलत आहे, तर दिंडोरी क्षेत्राची जागा अजूनही फारशी योग्य वाटत नाही त्याचबरोबर तेथील दरही जास्त आहेत. त्यामुळे ‘मेक इन महाराष्टÑ आणि नाशिक’ असे गोंडस नावे देऊनही नवा उद्योग नाशिकला येत नाही. अशावेळी मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही उद्योगांना जागा नाही अशी वेगळीच नकारात्मक बाब पसरली जात आहे. त्याचा फायदा विदर्भ विकासासाठी घेतला जात आहे. परंतु त्याचबरोबर विदर्भात उद्योग उभारण्यासाठी संपुटही दिली जात आहेत. त्याचा फटका नाशिकला बसू लागला आहे.वीजदराचा मोठा प्रश्नराज्य सरकारने मराठवाडा-विदर्भासाठी स्वतंत्र वीजदर घोषित केला. त्यानुसार युनिटमागे १ रुपया १७ पैसे वीजदर अनुदान मिळणार आहे, तर नाशिककरिता४५ पैसे अनुदान आहे. अलीकडेच राज्यशासनाने वाडा येथील डी प्लस झोनलादेखील अशीच सवलत दिली असून, त्यामुळे नाशिकमधील उद्योग विशेषत: रोलिंग मिल-स्टील उद्योग अडचणीच आले आहेत. त्यातूनही विदर्भातील सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी स्थलांतराचा कल राहू शकतो,असे जाणकारांचे म्हणणे आहे. महाराष्टÑात मुळातच यापूर्वी असलेली जकात आणि त्यानंतर एलबीटी तसेच एमआयडीसीतील अडचणी अशा अनेक कारणांमुळे आधीच अनेक उद्योगांनी गुजरात, चेन्नई, उत्तराखंडकडे उद्योग सुरू केले होते. परंतु नागपूर हे डेस्टिनेशनही उद्योजकांसाठी आकर्षण ठरू लागले आहे.विजेचे दर कमी आणि सरकारकडून हमी अशाप्रकारामुळे नाशिकचे उद्योग सहज जाण्यासाठी तयार होतात. नाशिकमध्ये असलेल्या काही मोठ्या उद्योगांना थेट मुख्यमंत्र्यांनीच साद घातली असल्याची चर्चा आहे. त्यातील एका उद्योगाचे नाशिकमध्ये दोन प्लांट असताना तिसरा प्लांट मात्र नाशिक ऐवजी विदर्भात सुरू केला आहे. काही नवीन प्रकल्प आता विदर्भाचाच विचार करीत असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री आणि राज्य सरकार समस्त राज्याचे असताना आता केवळ विदर्भात उद्योग सुरू होण्यासाठी वेगळा सवलतींचा निकष लावणे आश्चर्यकारक ठरले आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बाधक ठरण्याची शक्यता आहे.