शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

सवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:24 IST

नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देत असून, तेथे मिळणाºया संपुटामुळे अनेकांचे उद्योगदेखील सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.

ठळक मुद्देसवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण

संजय पाठक ।नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देत असून, तेथे मिळणाºया संपुटामुळे अनेकांचे उद्योगदेखील सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.नागपूरसह विदर्भाच्या विकासाला विरोध नाही, परंतु अशाप्रकारचा उद्योग पळवण्याचे प्रकार सुरू झाल्याने अनेक जाणकारांना आता वेगळ्या विदर्भाचा वासही येऊ लागला आहे.उत्तर महाराष्टÑाची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यात हवा, पाणी आणि दळणवळण यामुळे उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याचे मानले जाते. सुवर्ण त्रिकोणातील शहरामुळे मुंबई आणि पुण्यानंतर नाशिकचे नाव घेतले जात असले तरी गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये नवीन उद्योग आलेला नाही. विशेषत: औद्योगिक क्षेत्र उपलब्ध नसल्याने मोठी अडचण व्यक्त केली जाते. सिन्नरचा सेझ रखडला आहे आणि तेथे निर्यातक्षम उद्योगांनाच सवलत आहे, तर दिंडोरी क्षेत्राची जागा अजूनही फारशी योग्य वाटत नाही त्याचबरोबर तेथील दरही जास्त आहेत. त्यामुळे ‘मेक इन महाराष्टÑ आणि नाशिक’ असे गोंडस नावे देऊनही नवा उद्योग नाशिकला येत नाही. अशावेळी मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही उद्योगांना जागा नाही अशी वेगळीच नकारात्मक बाब पसरली जात आहे. त्याचा फायदा विदर्भ विकासासाठी घेतला जात आहे. परंतु त्याचबरोबर विदर्भात उद्योग उभारण्यासाठी संपुटही दिली जात आहेत. त्याचा फटका नाशिकला बसू लागला आहे.वीजदराचा मोठा प्रश्नराज्य सरकारने मराठवाडा-विदर्भासाठी स्वतंत्र वीजदर घोषित केला. त्यानुसार युनिटमागे १ रुपया १७ पैसे वीजदर अनुदान मिळणार आहे, तर नाशिककरिता४५ पैसे अनुदान आहे. अलीकडेच राज्यशासनाने वाडा येथील डी प्लस झोनलादेखील अशीच सवलत दिली असून, त्यामुळे नाशिकमधील उद्योग विशेषत: रोलिंग मिल-स्टील उद्योग अडचणीच आले आहेत. त्यातूनही विदर्भातील सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी स्थलांतराचा कल राहू शकतो,असे जाणकारांचे म्हणणे आहे. महाराष्टÑात मुळातच यापूर्वी असलेली जकात आणि त्यानंतर एलबीटी तसेच एमआयडीसीतील अडचणी अशा अनेक कारणांमुळे आधीच अनेक उद्योगांनी गुजरात, चेन्नई, उत्तराखंडकडे उद्योग सुरू केले होते. परंतु नागपूर हे डेस्टिनेशनही उद्योजकांसाठी आकर्षण ठरू लागले आहे.विजेचे दर कमी आणि सरकारकडून हमी अशाप्रकारामुळे नाशिकचे उद्योग सहज जाण्यासाठी तयार होतात. नाशिकमध्ये असलेल्या काही मोठ्या उद्योगांना थेट मुख्यमंत्र्यांनीच साद घातली असल्याची चर्चा आहे. त्यातील एका उद्योगाचे नाशिकमध्ये दोन प्लांट असताना तिसरा प्लांट मात्र नाशिक ऐवजी विदर्भात सुरू केला आहे. काही नवीन प्रकल्प आता विदर्भाचाच विचार करीत असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री आणि राज्य सरकार समस्त राज्याचे असताना आता केवळ विदर्भात उद्योग सुरू होण्यासाठी वेगळा सवलतींचा निकष लावणे आश्चर्यकारक ठरले आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बाधक ठरण्याची शक्यता आहे.