शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:24 IST

नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देत असून, तेथे मिळणाºया संपुटामुळे अनेकांचे उद्योगदेखील सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.

ठळक मुद्देसवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण

संजय पाठक ।नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देत असून, तेथे मिळणाºया संपुटामुळे अनेकांचे उद्योगदेखील सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.नागपूरसह विदर्भाच्या विकासाला विरोध नाही, परंतु अशाप्रकारचा उद्योग पळवण्याचे प्रकार सुरू झाल्याने अनेक जाणकारांना आता वेगळ्या विदर्भाचा वासही येऊ लागला आहे.उत्तर महाराष्टÑाची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यात हवा, पाणी आणि दळणवळण यामुळे उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याचे मानले जाते. सुवर्ण त्रिकोणातील शहरामुळे मुंबई आणि पुण्यानंतर नाशिकचे नाव घेतले जात असले तरी गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये नवीन उद्योग आलेला नाही. विशेषत: औद्योगिक क्षेत्र उपलब्ध नसल्याने मोठी अडचण व्यक्त केली जाते. सिन्नरचा सेझ रखडला आहे आणि तेथे निर्यातक्षम उद्योगांनाच सवलत आहे, तर दिंडोरी क्षेत्राची जागा अजूनही फारशी योग्य वाटत नाही त्याचबरोबर तेथील दरही जास्त आहेत. त्यामुळे ‘मेक इन महाराष्टÑ आणि नाशिक’ असे गोंडस नावे देऊनही नवा उद्योग नाशिकला येत नाही. अशावेळी मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही उद्योगांना जागा नाही अशी वेगळीच नकारात्मक बाब पसरली जात आहे. त्याचा फायदा विदर्भ विकासासाठी घेतला जात आहे. परंतु त्याचबरोबर विदर्भात उद्योग उभारण्यासाठी संपुटही दिली जात आहेत. त्याचा फटका नाशिकला बसू लागला आहे.वीजदराचा मोठा प्रश्नराज्य सरकारने मराठवाडा-विदर्भासाठी स्वतंत्र वीजदर घोषित केला. त्यानुसार युनिटमागे १ रुपया १७ पैसे वीजदर अनुदान मिळणार आहे, तर नाशिककरिता४५ पैसे अनुदान आहे. अलीकडेच राज्यशासनाने वाडा येथील डी प्लस झोनलादेखील अशीच सवलत दिली असून, त्यामुळे नाशिकमधील उद्योग विशेषत: रोलिंग मिल-स्टील उद्योग अडचणीच आले आहेत. त्यातूनही विदर्भातील सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी स्थलांतराचा कल राहू शकतो,असे जाणकारांचे म्हणणे आहे. महाराष्टÑात मुळातच यापूर्वी असलेली जकात आणि त्यानंतर एलबीटी तसेच एमआयडीसीतील अडचणी अशा अनेक कारणांमुळे आधीच अनेक उद्योगांनी गुजरात, चेन्नई, उत्तराखंडकडे उद्योग सुरू केले होते. परंतु नागपूर हे डेस्टिनेशनही उद्योजकांसाठी आकर्षण ठरू लागले आहे.विजेचे दर कमी आणि सरकारकडून हमी अशाप्रकारामुळे नाशिकचे उद्योग सहज जाण्यासाठी तयार होतात. नाशिकमध्ये असलेल्या काही मोठ्या उद्योगांना थेट मुख्यमंत्र्यांनीच साद घातली असल्याची चर्चा आहे. त्यातील एका उद्योगाचे नाशिकमध्ये दोन प्लांट असताना तिसरा प्लांट मात्र नाशिक ऐवजी विदर्भात सुरू केला आहे. काही नवीन प्रकल्प आता विदर्भाचाच विचार करीत असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री आणि राज्य सरकार समस्त राज्याचे असताना आता केवळ विदर्भात उद्योग सुरू होण्यासाठी वेगळा सवलतींचा निकष लावणे आश्चर्यकारक ठरले आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बाधक ठरण्याची शक्यता आहे.