शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

वडनेरभैरवच्या सरपंचपदी पाचोरकर ; उपसरपंचपदी योगेश साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 17:51 IST

वडनेरभैरव : जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या वडनेरभैरवच्या सरपंचपदी सुनील दत्तात्रेय पाचोरकर यांची तर उपसरपंचपदी योगेश अशोकराव साळुंखे हे अटीतटीच्या लढतीत निवडून आले.

ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार उत्तम भालेराव यांच्या गटाला आठ जागा, तर कादवाचे माजी संचालक संजय पाचोरकर, भाजपचे नेते बाळासाहेब माळी, माजी उपसरपंच बाबाजी सलादे, पोपटराव पाचोरकर यांच्या गटाला पाच तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव वक्ते यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या होत्या. प्रतिभा खेडकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. खिराडकर या भालेराव गटात सामील झाल्या तर भालेराव गटातीलच स्व.अशोक शिंदे पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील पाचोरकर यांनी सोडचिठ्ठी देत विरोधी गटांत सामील होत सरपंचपदावर विराजमान झाले. जास्त जागा निवडून आणूनही सरपंचपदाच्या निवडीत उत्तम भालेराव यांचे पुतणे रावसाहेब भालेराव यांना एका मताने पराभव पत्करावा लागला. निवडणूकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली होती. दि. २५ रोजी झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी सुनील पाचोरकर व रावसाहेब भालेराव यांनी अर्ज दाखल केला होता. यात पाचोरकर यांना नऊ, तर भालेराव यांना आठ मते मिळाली, तर उपसरपंचपदासाठी साळुंखे यांना नऊ व प्रतिभा खिराडकर यांना आठ मते मिळाली. १७ सदस्यांनी निवडप्रक्रियेत सहभाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी द्यानेश्वर सपकाळे यांनी सरपंचपदी पाचोरकर, तर उपसरपंचपदी साळुंखे निवडून आल्याचे घोषित केले.यावेळी सदस्य सुरेश वक्ते, मंगल देवरे, अरुण पवार, संजय पवार, विजय शिरसाठ, माधुरी जाधव, सुनील पाचोरकर, मंजूबाई निमकर, भागूबाई बिन्नर, अश्विनी डंबाळे, संगीता सगर, रत्ना माळी, सुनीता भालेराव, अमोल माळी यांच्यासह संपतराव वक्ते, पोपटराव पाचोरकर, बाळासाहेब माळी, बाबाजी सलादे, माजी चेअरमन राजाराम तिडके, संजय पाचोरकर, नाना सलादे, शशी वक्ते, अमित माळी, दीपक पाचोरकर, डॉ. सुनील आहेर, डॉ.प्रदीप परदेशी, माधवराव शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत