शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

ओझरला जपानुष्ठाण सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:37 IST

ओझरटाऊनशिप : येथील जगदगुरु जनार्दन स्वामी मौनिगरीजी महाराज आश्रमात गेल्या आठ दिवसापासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’ अशा प्रचंड जय घोषात संपन्न झाली. महामंडलेश्वर समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ओझर येथील आश्रमात जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित जपसाधना , रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ...

ओझरटाऊनशिप : येथील जगदगुरु जनार्दन स्वामी मौनिगरीजी महाराज आश्रमात गेल्या आठ दिवसापासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’ अशा प्रचंड जय घोषात संपन्न झाली. महामंडलेश्वर समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ओझर येथील आश्रमात जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित जपसाधना , रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी , आरती, प्रवचन ,सत्संग, एकनाथी भागवत वाचन, १०८ शिवलिंग तसेच १०८ गोमुख स्थापना ,श्री गणेश, श्री हनुमान मंदिर कलशारोहन सोहळा आदि भरगच्च कार्यक्रम झाले. जपानुष्ठानला बसणाऱ्या भाविकांनी आयुष्यभर व्यसनमुक्त आणि शाकाहारी राहण्याचा संकल्प केला.यावेळी साधकांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सांगतेनिमित्त ओझर परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत जपानुष्ठानास बसलेल्या साधकांसह कलशाधारी महिला,कुमारिका सहभागी झाल्या होत्या. सत्संग सोहळ्याप्रसंगी ब्रम्हचारी रामानंदी महाराज यांनी जपानुष्ठान आजच्या काळाची गरज असून अनेक प्रकारचे संस्कार जपानुष्ठानाच्या माध्यमातून केले जातात. मौनव्रतामूळे आत्मिक शक्ती वाढुन अध्यात्मिक ऊर्जा मिळते.जीवनात प्रत्येकाने सदगुरु करावे आणि त्यांच्या आदेशाचे पालन करावे. प्रत्येकाने वर्षातून एकतरी जपानुष्ठान करावे असेही यावेळी रामानंद महाराज यांनी सांगितले. यावेळी आठ दिवस केवळ हवेवर जपानुष्ठान करणाºया साधकास स्वामी शांतिगिरी महाराज यांनी तीर्थ देऊन त्यांच्या जपानुष्ठानाची सांगता केली. आठ दिवस केवळ पाणी आणि दुधावर जपानुष्ठान करणाºया साधकांच्याही व्रताची सांगता रामानंद महाराज यांच्या हस्ते तीर्थ देऊन करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक