शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा

By admin | Updated: March 7, 2017 00:46 IST

वीरगाव : बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील कान्हेरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. विशेष म्हणजे एकाच ट्रॅक्टरद्वारे या वाळूची वाहतूक होत आहे.

 वीरगाव : बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील कान्हेरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. विशेष म्हणजे एकाच ट्रॅक्टरद्वारे या वाळूची वाहतूक होत आहे. या प्रकरणी सदर ट्रॅक्टरमालकास त्वरित अटक करावी व होणारा वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी डोंगरेजचे सरपंच व उपसरपंच यांनी निवेदनाद्वारे बागलाणचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे. कान्हेरी नदी परिसरात सर्वात मोठे नदीपात्र म्हणून ओळखली जात असली तरी नदीपात्रातून होत असलेला वाळु उपसा यामुळे नदीपात्रात खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच या प्रकारामुळे परिसरातील विहीरींची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. यासाठी डोंगरेज ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन वाळु उपसा बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला होता. परंतु गावातीलच एका ट्रॅक्टरमालकाने या निर्णयाला केराची टोपली दाखवित आपली मुजोरी कायम ठेवली आहे. त्यास गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी वारंवार समज देण्याचा प्रयत्न केला असता, तुम्हाला काय करायचे ते करा, आमचे कुणीही वाकडे करु शकत नाही. अशा आशयाचा सज्जड दम देत हा ट्रॅक्टरमालक ग्रामस्थांनाच जिवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहे. डोंगरेज येथील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भेट घेत संंबंधित ट्रॅक्टरमालकावर कारवाई करण्यात यावी, यासाठी निवेदन दिले. (वार्ताहर)