शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव रब्बी हंगाम संकटात : बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:35 IST

सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यात ढगाळ हवामानमुळे व मर रोगाने कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविन्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. यामुळे रब्बी हंगाम संकटात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.

सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यात ढगाळ हवामानमुळे व मर रोगाने कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविन्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. यामुळे रब्बी हंगाम संकटात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. कांदा पिकाकडे शेतकरी आकर्षित झाले आहेत. कांदा हे तीन ते चार महिन्यांत येत आहे. नगदी पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. कांद्याला चालू वर्षी सुरुवातीपासून बाजारभाव चांगला असल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी समसमान क्षेत्र लागवड होणार आहे, पण निसर्गाच्या लहरीपणा आणि हवामानाचा हट्टीपणा बळीराजाचा पिच्छा सोडण्यास तयार होत नाही. परिणामी, महागडी औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे भाजीपाला पिकेही या वर्षी कवडीमोल भावात विकले जात असल्याने, परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती, पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे, ऐन जोमात असलेल्या कांदा पिकांवर्ती मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेड्या वाळणे असे अनेक रोग अट्याक करत आहे.पिके वाचविण्याचे आव्हानरोप वाचण्यापासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. कांदा लागवड करून लगेच दुसरे संकट मर रोगाचा प्रादुर्भाव. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. रबी हंगामातील पिकांची लागवड केली खरी, पण बदलत्या हमानामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचविण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.माझा दोन एकर कांदा लागवड करून एक महिने झाले आहेत. सुरुवातीपासून कांद्याला मर रोगाने ग्रासले आहे. बदलत्या हवामानामुळे कांद्यावर अनेक रोग चाल करत आहेत. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही.- संतोष बागुल, कांदा उत्पादक, वटार 

टॅग्स :onionकांदा