शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

‘ओतूर’ ओव्हरफ्लो

By admin | Updated: August 6, 2016 22:50 IST

‘ओतूर’ ओव्हरफ्लो

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर धरण गेल्या सामवारी पाण्याने पूर्णपणे भरले असून, ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.आतूर परिसरातील वीस गावांना या धरणाच्या पाण्याचा फायदा होतो. या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या धरणामध्ये यावर्षी ९७ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा झाला आहे. दररोज हजारो क्युसेस पाण्यचा विसर्ग होत असून, मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहात आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी अति पावसामुळे उपळल्या असून, शेतीतून पाणी वाहात आहे. त्यामुळे खरीपांचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. गेल्या रविवारी व सोमवारी पुनर्वसू नक्षत्राच्या शेवटच्या चरणात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. आता आश्लेषा नक्षत्रानेही पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या चार ते पाच वर्षात ओतूर धरणात एवढे पाणी आले नव्हते. नदीकाठच्या शेतकऱ्यांना प्रशसनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सदर मार्कंडेय नदी पुढे कळवण खुर्द गावाजवळ बेहडी नदीस मिळते व पुढे त्या गिरणा नदीत विलीन होतात. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्याने त्याचा खरीप पिकांना फायदा होणार आहे. या धरणामुळे शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बऱ्याच शेतरक्यांच्या शेतात पूरपाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले असून, पर्यायाने पिकांचे नुकसान झाले आहे. दोन तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओतूर धरणासह परिसरातील लहान मोठी पाझर तलावही पाण्याने भरली आहेत. या पावसामुळे आदिवासी व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ओतूर धरण भरल्याने व नदीला पहिला पूर आल्याने पाय रस्ते वाहून गेले आहेत. डोंगर उतारावरून माती वाहून आल्याने सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. काही रस्त्याच्या साईड पट्ट्या व मातीचा भराव वाहून गेला आहे. (वार्ताहर)नाशिक मनपाकडून नुकसानीचे पंचनामे सुरूनाशिक : गेल्या मंगळवारी (दि. २) शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच गोदावरीला आलेल्या महापुरामुळे ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. दिवसभरात सुमारे २५० पंचनामे करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका यांच्या वतीने घरांचे, दुकानांचे तसेच धान्य व इतर मालमत्ता यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे. त्यासाठी १० पथके तैनात करण्यात आली आहेत. शिवाजीवाडी येथे २१० पंचनामे तर नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरवाडी येथे ४० पंचनामे करण्यात आले. (प्रतिनिधी)