शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

दुसऱ्या शाहीस्नानासाठी निश्चित जास्त साधू-भाविक येतील

By admin | Updated: September 4, 2015 00:39 IST

साधू-महंतांचा ठाम विश्वास : जन्माष्टमीनंतर ओघ वाढेल

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करूनही सुमारे तीन लाख साधू-महंत येण्याची शक्यता असताना केवळ ३० हजार साधू आले; परंतु दुसऱ्या व तिसऱ्या शाही पर्वणीसाठी मात्र निश्चित जास्त साधू-महंत येतील, असा ठाम विश्वास अनेक साधू-महंतांनी यासंबंधी माहिती देताना व्यक्त केला. तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर भाविकांची संख्यादेखील वाढेल, असेही त्यांनी सांगितले.उत्तर भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हा सण आटोपल्यावर सिंहस्थासाठी निश्चितच भाविक तसेच साधू येतील, असेही त्यांनी सांगितले. अखिल भारतीय श्री पंच रामानंद निर्मोही आखाड्याचे महंत परमात्मादास महाराज म्हणाले की, पहिले शाहीस्नान आणि दुसरे शाहीस्नान यात दोन आठवड्याचे अंतर आहे. याउलट दुसऱ्या व तिसऱ्या शाहीस्नानात फक्त चार दिवसांचे अंतर असल्याने साधू व भाविक लोक दुसरे आणि तिसरे शाहीस्नान करूनच जातील. काही पहिल्या शाहीस्नानासाठी आलेले साधू आणि भाविक आता जन्माष्टमीसाठी आपापल्या मंदिर, मठात तसेच मूळ गावी गेले आहेत. त्यांच्यासोबत परत आता खूप लोक येतील, तर अखिल भारतीय श्री पंच निर्माेही अनी आखाड्याचे महंत राजेंद्रदास म्हणाले की, प्रशासनाने सुविधा खूपच चांगली ठेवली आहे, परंतु भाविकांना सक्तीच्या बंदीचा त्रास झाला. दुसऱ्या व तिसऱ्या पर्वणीला बॅरिकेडिंगचे अंतर थोडे कमी करून शिथिलता केली, तर गर्दीचा महापूर येईल. सध्याही साधू-महंत मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत; परंतु साधुग्रामचा विस्तार मागील सिंहस्थापेक्षा मोठा असल्याने एकाच ठिकाणी गर्दी जाणवत नाही. घाटदेखील खूप आहेत. त्यामुळे गर्दी ही कधीही दिवसेंदिवस वाढत असते, कमी होत नसते, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)