शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

प्रमाणपत्राअभावी ‘अनाथ’ उमेदवार भरतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:36 IST

राज्य सरकारने आई-वडील नसलेल्या निराधार अनाथ उमेदवारांना सरकारी नोकरीत एक टक्का आरक्षणाची घोषणा केली असली तरी, मुळात अनाथ असलेल्यांना ते अनाथ असल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यास राज्यातील महिला व बाल विकास खाते टाळाटाळ करीत असल्यामुळे राज्य सरकारच्या मेगा भरतीपासून उमेदवारांना ‘अनाथ’ व्हावे लागण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : राज्य सरकारने आई-वडील नसलेल्या निराधार अनाथ उमेदवारांना सरकारीनोकरीत एक टक्का आरक्षणाची घोषणा केली असली तरी, मुळात अनाथ असलेल्यांना ते अनाथ असल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यास राज्यातील महिला व बाल विकास खाते टाळाटाळ करीत असल्यामुळे राज्य सरकारच्या मेगा भरतीपासून उमेदवारांना ‘अनाथ’ व्हावे लागण्याची चिन्हे आहेत. महिनोंमहिने पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांकडून अनाथांना प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल अनाथांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.आई-वडिलांनी बेवारस म्हणून सोडून दिलेल्या अनाथांच्या पालनपोषणाची जबाबदारी सरकारची असून, त्यासाठी राज्यात एकेकाळी सुमारे एक हजाराहून अधिक बालगृहे चालविली जात होती. परंतु सरकारने यातील आपली जबाबदारी हळूहळू काढून घेत आता हीच संख्या तीनशेवर आली आहे. तर वयात आलेल्या अनाथांचे शिक्षण व सांभाळ करण्यासाठी सरकारने राज्यात २२ सरकारी व ५७ खासगी अनुदानावर केंद्रे चालविली जात आहेत. जाणकारांच्या मते राज्यात अनाथांची संख्या शेकडोच्या संख्येने असून, ज्या ज्या संस्थांमध्ये जागा रिक्त आहेत, अशा ठिकाणी या अनाथांची महिला व बाल विकास विभागाकडून रवानगी केली जाते. अशी रवानगी करताना अनाथ ज्या संस्थेत अगोदर दाखल असेल त्या संस्थेचे प्रमाणपत्र, बालकल्याण समितीचे प्रमाणपत्र अशा शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून अंतिम प्रमापत्र महिला व बाल कल्याण विभागीय उपआयुक्तांकडून प्राप्त करून घ्यायचे असते. परंतु बहुतांशी उपायुक्त कार्यालयांकडून अनाथांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ चालविली जाते. या प्रमाणपत्राअभावी अनाथांना शैक्षणिक प्रवेश, परीक्षा शुल्क, निवास व विशेषत: नोकरीपासून वंचित रहावे लागते. सर्व कागदपत्रांनिशी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपआयुक्तांकडे प्रकरण सादर केल्यास साधारण: ४० दिवसांच्या आत चौकशी करून प्रमाणपत्र अदा करावे, असे अपेक्षित असले तरी नाशिकच्या नारी विकास स्वाधार केंद्रात राहणाºया एका तरुणीने फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद येथे प्रस्ताव सादर करूनही तिला प्रमाणपत्र मिळालेले नाही.संधी हुकण्याची भीतीराज्यात अनाथांची संख्या लक्षणीय असतानाही जेमतेम १० ते १५ अनाथांनाच प्रमाणपत्र अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामागे सरकार अनाथांप्रती आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अर्थ काढला जात असून, लवकरच राज्य सरकारकडून मेगा नोकर भरती केली जाणार असल्याने व त्यात अनाथांना एक टक्का आरक्षण मंजूर करण्यात आल्याने अनाथांची संधी प्रमाणपत्राअभावी हुकण्याची भीती वर्तविली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारjobनोकरी