शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

प्रमाणपत्राअभावी ‘अनाथ’ उमेदवार भरतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:36 IST

राज्य सरकारने आई-वडील नसलेल्या निराधार अनाथ उमेदवारांना सरकारी नोकरीत एक टक्का आरक्षणाची घोषणा केली असली तरी, मुळात अनाथ असलेल्यांना ते अनाथ असल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यास राज्यातील महिला व बाल विकास खाते टाळाटाळ करीत असल्यामुळे राज्य सरकारच्या मेगा भरतीपासून उमेदवारांना ‘अनाथ’ व्हावे लागण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : राज्य सरकारने आई-वडील नसलेल्या निराधार अनाथ उमेदवारांना सरकारीनोकरीत एक टक्का आरक्षणाची घोषणा केली असली तरी, मुळात अनाथ असलेल्यांना ते अनाथ असल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यास राज्यातील महिला व बाल विकास खाते टाळाटाळ करीत असल्यामुळे राज्य सरकारच्या मेगा भरतीपासून उमेदवारांना ‘अनाथ’ व्हावे लागण्याची चिन्हे आहेत. महिनोंमहिने पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांकडून अनाथांना प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल अनाथांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.आई-वडिलांनी बेवारस म्हणून सोडून दिलेल्या अनाथांच्या पालनपोषणाची जबाबदारी सरकारची असून, त्यासाठी राज्यात एकेकाळी सुमारे एक हजाराहून अधिक बालगृहे चालविली जात होती. परंतु सरकारने यातील आपली जबाबदारी हळूहळू काढून घेत आता हीच संख्या तीनशेवर आली आहे. तर वयात आलेल्या अनाथांचे शिक्षण व सांभाळ करण्यासाठी सरकारने राज्यात २२ सरकारी व ५७ खासगी अनुदानावर केंद्रे चालविली जात आहेत. जाणकारांच्या मते राज्यात अनाथांची संख्या शेकडोच्या संख्येने असून, ज्या ज्या संस्थांमध्ये जागा रिक्त आहेत, अशा ठिकाणी या अनाथांची महिला व बाल विकास विभागाकडून रवानगी केली जाते. अशी रवानगी करताना अनाथ ज्या संस्थेत अगोदर दाखल असेल त्या संस्थेचे प्रमाणपत्र, बालकल्याण समितीचे प्रमाणपत्र अशा शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून अंतिम प्रमापत्र महिला व बाल कल्याण विभागीय उपआयुक्तांकडून प्राप्त करून घ्यायचे असते. परंतु बहुतांशी उपायुक्त कार्यालयांकडून अनाथांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ चालविली जाते. या प्रमाणपत्राअभावी अनाथांना शैक्षणिक प्रवेश, परीक्षा शुल्क, निवास व विशेषत: नोकरीपासून वंचित रहावे लागते. सर्व कागदपत्रांनिशी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपआयुक्तांकडे प्रकरण सादर केल्यास साधारण: ४० दिवसांच्या आत चौकशी करून प्रमाणपत्र अदा करावे, असे अपेक्षित असले तरी नाशिकच्या नारी विकास स्वाधार केंद्रात राहणाºया एका तरुणीने फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद येथे प्रस्ताव सादर करूनही तिला प्रमाणपत्र मिळालेले नाही.संधी हुकण्याची भीतीराज्यात अनाथांची संख्या लक्षणीय असतानाही जेमतेम १० ते १५ अनाथांनाच प्रमाणपत्र अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामागे सरकार अनाथांप्रती आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अर्थ काढला जात असून, लवकरच राज्य सरकारकडून मेगा नोकर भरती केली जाणार असल्याने व त्यात अनाथांना एक टक्का आरक्षण मंजूर करण्यात आल्याने अनाथांची संधी प्रमाणपत्राअभावी हुकण्याची भीती वर्तविली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारjobनोकरी