शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासांची उत्पत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:42 IST

वडाळागाव परिसरात चिकुनगुनियासदृश आजारासह विषमज्वर, विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. येथील घरांची तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासाच्या उत्पत्तीला पूरक असे पाण्याचे साठे आढळून आले आहेत.

नाशिक : वडाळागाव परिसरात चिकुनगुनियासदृश आजारासह विषमज्वर, विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. येथील घरांची तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासाच्या उत्पत्तीला पूरक असे पाण्याचे साठे आढळून आले आहेत. वडाळागाव परिसरात मिश्र आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये ६५ रुग्णांना सांधेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. रुग्णांमध्ये हिवतापाची लक्षणे दिसत नसली तरी चिकुनगुनिया संशयित रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या भागात महापालिकेच्या आरोग्य व राज्य शासनाच्या शहर आरोग्य विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने घरांना भेटी देत पाण्याचे साठे तपासले जात आहे. तसेच डासप्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणीलाही प्रारंभ करण्यात आला आहे. दोन दिवसात ४६ नागरिकांच्या घरांमधील पाणीसाठ्यात एडीस डासाच्या अळ्या, कोष आढळून आल्याच्या नोंदी आरोग्य विभागाने घेतल्या आहेत. स्वच्छ पाणीसाठ्यामध्ये या डासाची उत्पत्ती होत असल्यामुळे पाण्याचे साठे उघडे न ठेवता ते दिवसाआड स्वच्छ करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.  आरोग्य विभाग जरी जागा झाला असला तरी या विभागाला महापालिकेच्या अन्य विभागांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय साथीच्या आजारावर मात करणे शक्य होणार नाही. येथील मनपा शाळेच्या परिसरातील कोळीवाडा, माळी गल्ली, संजरी मार्ग, गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, राजवाडा, रजा चौक, केबीएच विद्यालयाचा परिसर, जय मल्हार कॉलनी या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. माळी गल्ली, बारा खोली, गरीब नवाज कॉलनी आदी परिसरातील पाण्याचे नमुने संकलित करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.  जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गुरुवार (दि. २१) दुपारपर्यंत नमुन्यांचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. दूषित पाण्यावाटे पसरणारे आजारांचे निदान अहवालातून स्पष्ट होईल.दूषित पाण्यावाटे आजारांचा फैलाववडाळागावातील प्रभावित भागात काही ठिकाणी पाण्याला पिवळसर रंग दिसत आहे. पिण्याचे पाणी गढूळ मातीमिश्रित असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच काही परिसरांमध्ये पाण्याला दुर्गंधीही जाणवत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. यामुळेदेखील पाण्यावाटे पसरणाºया आजाराचा फैलाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील परिसरात जुनाट जलवाहिन्या असून, जलवाहिन्या या भूमिगत गटारींच्या शेजारून टाकण्यात आलेल्या आहेत. गटारींमधील सांडपाणी जलवाहिन्यांची अंतर्गत गळतीमधून मिसळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Healthआरोग्य