शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

आदिवासी महिला मंडळाने फुलविली सेंद्रिय परसबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:17 IST

पिंपळगाव बसवंत (गणेश शेवरे) : आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतांपासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने आहेरगाव येथील आदिवासी महिलांनी परसबाग फुलविली आहे.

पिंपळगाव बसवंत  : आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतांपासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने आहेरगाव येथील आदिवासी महिलांनी परसबाग फुलविली आहे. त्यातून पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून पिके घेतली जात आहेत.आहेरगाव येथील शेतकरी नानुबाई गवळी यांनी आपली जागा महिला मंडळाला उपलब्ध करून देत या जागेत नांगरण, माती टाकणे, संरक्षक कुंपण घालण्यासाठी निधी देखील ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिला आहे.काट्या कुट्या असलेल्या जागेची मशागत केली. त्यात माती टाकून नांगरून वाफे बनविणे त्या वाफ्यांना विटा लावणे , प्राण्यांपासून बागेचे संरक्षण होण्यासाठी सभोवती कुंपण घातले आहे. यासाठी ग्रामपंचायत निधी उपलब्ध करून दिला सुरवातीला जुन्या साड्या, गोणपाट, युरियाची पोती, बांबू अशा वस्तूंचा वापर करण्यात आला. पण ग्रामपंचायतने सहकार्य केल्याने एक गोलाकार स्ट्रक्चर तयार करण्यात आले व सुंदर अशी परस बाग तयार केली. त्या परस बागेच्या गोेलाकार रचनेमध्ये बाहेरील गोलामध्ये वांगी ,कांदे लसूण,पपई व शेवगा, मधल्या टप्प्यात वांगी, टोमॅटो,मिर्ची मध्यभागी मिरची मेथी ,कांदे ,भेंडी , डिंगऱ्या,आळु, चटकचदणी वेल, लाल बिट,गाजर,वांगी ,पुदिना, पालक, तर शेवंती ,चणीगुलाब ,मोगरा,झेंडूची फुलेआदी फुलांची देखील लागवड केली आहे. यासाठी आहेरगाव येथील ग्रामपंचायत ,पोलिस पाटील व जिजामाता ग्रामसंघ महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.------------------------------दर्जेदार भाजीपाला निर्मितीचा उद्देशरासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खते, शेण, राख,लसूण व कडू लिंबाच्या पानाचा रस कुटून त्यात गाईचं गोमूत्र टाकून २१ दिवस आंबवले जाते व २२ व्या दिवशी सकाळी ते औषध फवारले जातात व विना रासायनिक पिके घेतले जातात. त्यामुळे येथील जमिनीचा पोत सुधारणे, पाण्याची बचत, मातीची धूप रोखणे, जलधारणशक्ती वाढविणे असे अनेक फायदे होत असून विषमुक्त भाजीपाला निर्मिती होत असल्याची माहिती या मंडळाच्या अध्यक्ष सविता गांगुर्डे ,संगीता बागुल व विद्या देशमुख यांनी दिली......................................हा परसबागा फुलविण्यासाठी ग्रामपंचायत व जागा मालक गवळी यांनी मदत केली. शासनाने देखील मदत केली तर आहरेगावतच नाहीतर प्रत्येक गावात सेंद्रिय भाजीपाला निर्मिती करणारे परस बाग तयार होतील. त्याचा आरोग्यासाठी देखील उपयोग होईल.-सविता गांगुर्डे, महिला मंडळ अध्यक्ष

टॅग्स :Nashikनाशिक