शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

अर्जुनसागरमधून पाणी नेण्याच्या योजनेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:52 IST

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकळवण : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली भूमिका

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांनी खुशाल भूमिपूजन करून पाण्याचे गाजर दाखवावे; परंतु पाइपलाइनचा एक पाइपही कळवण तालुक्यात उतरू देणार नसल्याचा पवित्रा कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना, प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी घेतल्यामुळे केळझरची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत.अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास तालुक्यातील जनतेचा विरोध असून, जनतेचा रोष पत्करून मुख्यमंत्री फडणवीस या योजनेचे भूमिपूजन असल्याने कळवण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.जलवाहिनी काय पण एक पाइपसुद्धा कळवण तालुक्यात उतरू देणार नाही, कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांबरोबर घेऊन जनआंदोलन करू व ही योजना आणि निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, तापर्यंत तालुक्यात ठिकठिकाणी जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संदीप वाघ, प्रहार संघटनेचे युवराज पगार, सरपंच प्रकाश पवार, पिंटू मोरेसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला आहे.पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही, तर जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे, त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे.याविषयी कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास विरोध असल्याचा ठराव करु न शासन दरबारी ठराव पाठवले तरी शासन गंभीर नसून ग्रामसभांच्या ठरावांना शासन गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले असल्याने सटाण्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.