शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अर्जुनसागरमधून पाणी नेण्याच्या योजनेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:52 IST

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकळवण : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली भूमिका

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांनी खुशाल भूमिपूजन करून पाण्याचे गाजर दाखवावे; परंतु पाइपलाइनचा एक पाइपही कळवण तालुक्यात उतरू देणार नसल्याचा पवित्रा कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना, प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी घेतल्यामुळे केळझरची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत.अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास तालुक्यातील जनतेचा विरोध असून, जनतेचा रोष पत्करून मुख्यमंत्री फडणवीस या योजनेचे भूमिपूजन असल्याने कळवण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.जलवाहिनी काय पण एक पाइपसुद्धा कळवण तालुक्यात उतरू देणार नाही, कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांबरोबर घेऊन जनआंदोलन करू व ही योजना आणि निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, तापर्यंत तालुक्यात ठिकठिकाणी जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संदीप वाघ, प्रहार संघटनेचे युवराज पगार, सरपंच प्रकाश पवार, पिंटू मोरेसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला आहे.पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही, तर जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे, त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे.याविषयी कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास विरोध असल्याचा ठराव करु न शासन दरबारी ठराव पाठवले तरी शासन गंभीर नसून ग्रामसभांच्या ठरावांना शासन गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले असल्याने सटाण्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.