शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनसागरमधून पाणी नेण्याच्या योजनेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:52 IST

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकळवण : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली भूमिका

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांनी खुशाल भूमिपूजन करून पाण्याचे गाजर दाखवावे; परंतु पाइपलाइनचा एक पाइपही कळवण तालुक्यात उतरू देणार नसल्याचा पवित्रा कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना, प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी घेतल्यामुळे केळझरची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत.अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास तालुक्यातील जनतेचा विरोध असून, जनतेचा रोष पत्करून मुख्यमंत्री फडणवीस या योजनेचे भूमिपूजन असल्याने कळवण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.जलवाहिनी काय पण एक पाइपसुद्धा कळवण तालुक्यात उतरू देणार नाही, कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांबरोबर घेऊन जनआंदोलन करू व ही योजना आणि निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, तापर्यंत तालुक्यात ठिकठिकाणी जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संदीप वाघ, प्रहार संघटनेचे युवराज पगार, सरपंच प्रकाश पवार, पिंटू मोरेसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला आहे.पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही, तर जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे, त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे.याविषयी कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास विरोध असल्याचा ठराव करु न शासन दरबारी ठराव पाठवले तरी शासन गंभीर नसून ग्रामसभांच्या ठरावांना शासन गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले असल्याने सटाण्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.