शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बारावीच्या श्रेणीसुधार गुणपत्रिकांसाठी विद्यार्थांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ पर्याय सादर करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:13 IST

नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२० श्रेणीसुधार परीक्षेची गुणपत्रिका मिळविण्यासाठी पर्याय सादर करण्यासाठी महाराष्ट्र ...

नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२० श्रेणीसुधार परीक्षेची

गुणपत्रिका मिळविण्यासाठी पर्याय सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ३० एप्रिलपर्यंत संधी दिली आहे.

कोरोना संकटामुळे गेल्यावर्षी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर श्रेणी सुधार योजनेंतर्गत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचा विकल्प सादर करून सुधारित गुणपत्रिकेची मागणी केल्यास सुधारित गुणपत्रिका बदलून देण्याचा कालावधी एक महिन्याऐवजी सहा महिन्यांपर्यंत वाढविण्यात आलेला होता. मात्र, राज्यातील कोविड-१९ विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी- मार्च २०२० उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट झालेले विद्यार्थी काही अपरिहार्य कारणास्तव सहा महिन्यांच्या कालावधीत पर्याय सादर करू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी केवळ २०२०-२१ या वर्षासाठी विशेष सवलत म्हणून पर्याय सादर करण्यास दि.३० एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट झालेले विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी व विभागीय मंडळांशी संपर्क साधून ३० एप्रिलपर्यंत योग्य तो पर्याय निवडून यासंबंधीचा प्रस्ताव विभगीय मंडळाला सादर करण्याच्या सूचना राज्य मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.