शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

प्रस्थापितांचे घोंगडे झटकून नवोदितांना संधी

By किरण अग्रवाल | Updated: October 27, 2019 01:31 IST

छगन भुजबळ, दादा भुसे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर व नरहरी झिरवाळ या विद्यमानांचे निकाल दृष्टिपथात होतेच; पण याखेरीजच्या अन्य मातब्बरांना धक्के देत मतदारांनी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना चपराक लगावली आहे. दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे व मौलाना मुफ्ती यांना ‘कम बॅक’ करण्याची संधी त्यातूनच लाभून गेली.

ठळक मुद्दे उमेदवार किंवा त्यांच्या पक्षांचाच नव्हे, तर हा मतदारांचाही विजयगृहीत धरणाऱ्यांना  आणले जमिनीवरकोणी कितीही म्हटले तरी यंदाची निवडणूक एकतर्फी नाही

सारांशपक्षांतरे असोत, की उमेदवारी; मतदारांना गृहीत धरून राजकीय पक्षांकडून घेतले जाणारे निर्णय प्रसंगी कसे ठोकरून लावले जाऊ शकतात याचा पुन:प्रत्यय याही निवडणुकीत येऊन गेला आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत प्रस्थापित उमेदवारांना नाकारत नवोदितांना मुंबईत पाठविले गेल्याचे निकाल तेच सांगून जाणारे आहेत.कोणी कितीही म्हटले तरी यंदाची निवडणूक एकतर्फी नाही, हे याच स्तंभात वेळोवेळी निदर्शनास आणून दिले गेले होते. तरी काही उमेदवार आपल्याला स्पर्धाच नसल्याच्या आविर्भावात वावरत होते. सत्ताधारी भाजप-शिवसेना या पक्षांची तर आपण ठरवू ती पूर्व दिशा, अशीच वाटचाल होती. त्यातून भरघोस प्रमाणात पक्षांतरे तर घडून आलीच, शिवाय जनमानसाचा अंदाज न घेता; अगर त्यांना गृहीत धरून उमेदवाºया दिल्या गेल्या. त्याचा फटका संबंधिताना बसला. जिल्ह्यातील नऊ विद्यमान आमदारांना पराभवास सामोरे जाण्याची वेळ आल्याचे पाहता, वातावरण जर खरेच सत्ताधाºयांना अनुकूल राहिले असते तर असे घडले असते का, असा साधा प्रश्न यातून उपस्थित होऊ शकणारा आहे. कारण, यात विरोधी पक्षांच्या उमेदवारांखेरीज सत्ताधारी पक्षांचे अनिल कदम, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप व निर्मला गावित यांचाही समावेश आहे.महत्त्वाचे म्हणजे, कळवण-सुरगाण्यातील जे.पी. गावित, देवळालीतील घोलप व नांदगावमधील पंकज भुजबळ हे जिल्ह्यातील त्या त्या पक्षातील मातब्बर व प्रस्थापित उमेदवार होते. गावितांनी आजवर त्यांचा लालगड अभेद्य राखला होता, तर घोलपांनीही तब्बल तीन दशके एकहाती वर्चस्व राखलेले होते. पण मतदारांच्या मानसिकतेतील बदलाचा विचार करून स्वत:त बदल न केल्याने त्यांना जनतेनेच घडविलेल्या बदलाला सामोरे जावे लागले. नांदगावात पंकज भुजबळ व नाशिक पूर्वमध्ये बाळासाहेब सानप थांबू शकले नाहीत, त्यामुळे मतदारांनी त्यांना थांबवले. इगतपुरीमध्ये तर काँग्रेसच्याच तिकिटावर लढल्या असत्या तर निवडून येण्याची शक्यता अधिक राहिलेल्या निर्मला गावित यांनी शिवसेनेत जाऊन शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या या प्रयत्नावर मतदारांनी पाणी फिरवले. म्हणजे, वर्षानुवर्षांपासून काम करणाºयांना पक्षाकडून डावलले जाणे जसे मतदारांना रुचले नाही, तसे केवळ सत्तेच्या छावणीत जाऊ पाहण्याचे प्रयत्नही पटले नाही हेच निकालावरून लक्षात यावे.अर्थात, निफाडमध्ये अनिल कदम यांची विजयाची हॅट्ट्रिक हुकण्यामागे मतविभाजनाचे प्रमुख कारण दिसून येते, तर नांदगावमध्ये सुहास कांदे यांच्या विजयासाठीही हाच फॅक्टर कारणीभूत ठरला. सर्वाधिक उत्कंठेची लढत ठरलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांना मिळालेला विजयही मतविभाजनातूनच साकारल्याचे स्पष्ट आहे. येथे एकाच मतदारसंघात अनेकांनी बळ आजमावणी केली. त्यातून मतांचे विभाजन होऊन पक्षीय बांधिलकीतून लाभलेली मते व गत पाच वर्षातील काम आणि संपर्कामुळे सीमा हिरे यांचा विजय सुकर ठरून गेला. हे होत असताना ज्या जागेसाठी संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी राजीनामास्र उगारून प्रतिष्ठा पणास लावली तेथे मात्र सेना बंडखोराला मतदारांनी तब्बल पाचव्या क्रमांकावर ठेवल्याची बाब या पक्षासाठीच नाचक्कीदायी ठरली.एक बरे झाले, प्रस्थापिताना ठोकरताना मतदारांनी नवीन चेहºयांना संधी देत राजकीय प्रवाहावरील शेवाळ दूर करण्याचा प्रयत्न केलेलाही दिसून आला. देवळालीतील सरोज अहिरे या तर तब्बल ५८ टक्केपेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या आहेत, तर ज्यांना कुणी जमेत धरले नव्हते त्या इगतपुरीतील कॉँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनीही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकची मते मिळवून आपला विजय नोंदविला. बोलून दाखविल्या जाणाºया लाटेपेक्षा सुप्त लाट कशी उलथापालथ घडवते, ते या दोन्ही ठिकाणी पहावयास मिळाले. कळवणमध्ये धडपडी व पित्याचा सर्वसमावेशक राजकारणाचा वारसा चालवू पाहणाºया नितीन पवार या तरुणाला पसंती लाभली, तर नाशिक पूर्वमध्येही त्याच पद्धतीने म्हणजे पित्याच्या पावलावर पाऊल ठेवणाºया अ‍ॅड.राहुल ढिकले यांना पहिल्या प्रयत्नातच मतदारांनी समर्थन दिले. नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी स्वप्नपूर्ती साधली. हे पाचही नवीन चेहरे यंदा जिल्ह्याला लाभले. शिवाय, बनकर, कोकाटे, बोरसे व मौलानांचे ‘कम बॅक’ झाल्याने सहाही विद्यमानांसह हे सारे नवे-जुने मिळून मतदारांची अपेक्षापूर्ती साधतील, अशी आशा करूया...

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNarhari Jhariwalनरहरी झिरवाळ