शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

सुवर्णत्रिकोणाच्या कनेक्टिव्हिटीतून जिल्ह्याच्या विकासाला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

नाशिक : जिल्ह्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नाशिकमध्ये शाश्वत विकासाचा भक्कम पाया उभा राहण्याचे आवश्यकता असून, कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ...

नाशिक : जिल्ह्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नाशिकमध्ये शाश्वत विकासाचा भक्कम पाया उभा राहण्याचे आवश्यकता असून, कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण मुंबई, पुणे या सुवर्णत्रिकोणात आलो तर जिल्ह्याच्या विकासाला चांगली संधी असल्याचे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मांडले. विकासाचा दृष्टिकोन असलेल्या घटकांनी शाश्वत विकासासाठीची दिशा ठरविणे अपेक्षित असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘लोकमत’ नाशिक आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना स्पष्ट केली. नाशिकला विकासाची चांगली संधी असून आपण अजूनही अशा संधींचा पुरेपूर वापर केलेला नाही. मुंबई, पुणे या शहरांनंतर विकासाचे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते. या शहरांचा विकास तेथील कनेक्टिव्हिटीमुळे झालेला आहे. नाशिकची कनेक्टिव्हिटी काहीशी कमी पडते. याबाबत आपण आता सक्षम होण्याची गरज आहे सुदैवाने समृद्धी महामार्ग, एअरपोर्ट तसेच नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पामुळे संधी चालून आली आहे. त्या माध्यामातून नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे.

कोणत्याही शहराची प्रगती ही तेथील कनेक्टिव्हिटीशी निगडीत असते. मुंबई, पुणे शहराची प्रगती यामुळे झाली असली तरी ही शहरे आता ओव्हरफ्लो झाली आहे, तर नाशिकची कंट्रोल ग्रोथ असल्याने नाशिकला चांगली संधी आहे. आपल्याकडे चांगल्या आयटी इंडस्ट्रीज, ॲग्रो प्रोसेसिंग आणण्याची आवश्यकता आहे. वायनरीच्या बाबतीत जी प्रगती झाली ती कांद्याच्या प्रोसेसबाबत तसेच स्टोरेजबाबत अजूनही सक्षमतेने झालेली नाही. या क्षेत्रात मोठ्या कामाची संधी आहे. फ्रुट प्रोसेसिंगवर मोठे अर्थकारण होत असल्याची उदारहणे आहे त्यादृष्टीने जिल्ह्याला संधी आहे.

नाशिकची शेती, हवामान, द्राक्ष येथील माणसांचे स्वभाव चांगले ही जिल्ह्याची शक्तिस्थळे आहेत, मात्र त्याचा पूर्णक्षमतेने होताना दिसत नाही. आपण अजूनही आपल्या क्षमतांचा पुरेपूर विकास करू शकलेलो नाही. ही संधी आता निर्माण होऊ पाहत आहे. कायमस्वरूपी शाश्वत विकासासाठी जिल्ह्यातील चांगल्या संस्था आणि व्यक्तींने विकासाची दिशा ठरविणे अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. अशी व्यवस्था एकाच छताखाली निर्माण करण्याचे ठरविले असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

विकासाचा ध्यास असलेली लोकभावना आपल्याकडे आहे. त्यांची दिशा निश्चित झाली तर नाशिकमध्ये शाश्वत विकासाला चांगली संधी आहे. यासाठी व्हिजन असलेली थिंक टँक आणि सपोर्टिव्ह सिस्टम उभारण्याची गरज असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

---इन्फो--

महसुलाचे उदिष्ट पुर्ण करणारा जिल्हा

मागीलवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्याला ५० कोटी अधिक महसुलीचे उद्दिष्ट होते. जिल्ह्याने २४२ कोटींचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करीत विभागात उत्तम कामगिरी केली. कोरेाना संकटातही जिल्ह्याने २२९ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २५४ कोटी २८ लाखांची अशी एकूण १११ टक्के वसुली करीत विभागात पहिला क्रमांक मिळविला.

सेवा हमी कायद्याच्या कामाचे राज्याच्या सचिवांनी दखल घेतली आहे. शंभरपेक्षा अधिक सेवा या कायद्याच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. साडेदहा हजार सेवा दिल्या. शेतकऱ्यांचे कर्जवाटपातही जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली असून, ३ हजार ४७ कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. पीक विमा योजनेचे १८७ कोटींचे नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली कोरोनातही कोणताचा परिणाम प्रशासकीय कामावर झाला नाही.