शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

मोदींच्या डिजिटल इंडियात ‘मुक्त विद्यापीठ’

By admin | Updated: April 6, 2017 01:27 IST

‘डिजिटल इंडिया’ अभियानात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला ‘डिजिटल साक्षरता‘ उपक्रमाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी प्राप्त झाल्याने मुक्तचाही सहभाग लक्षणीय ठरणार आहे

संदीप भालेराव नाशिकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘डिजिटल इंडिया’ अभियानात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला ‘डिजिटल साक्षरता‘ उपक्रमाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी प्राप्त झाल्याने मोदींच्या डिजिटल मोहिमेत मुक्तचाही सहभाग लक्षणीय ठरणार आहे. ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याच्या कार्याची दखल घेऊन केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुचनेनुसार मुक्त विद्यापीठाकडे ग्रामीण डिजिटल साक्षरतेची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मुक्त विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १ जुलै रोजी देशात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात केली. देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढावा त्याबरोबरच देशाला माहिती तंत्रज्ञानावर आधारित अर्थसत्ता बनविण्याची घोषणा मोदी यांनी केली आहे. या अभियानांतर्गत देशात डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी व्यापक कार्यक्रम आखण्यात आला असून, महाराष्ट्रात ज्या काही संस्थांची मदत घेण्यात आली आहे. त्यामध्ये मुक्त विद्यापीठाचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्राच्या योजनेत थेट योगदान देण्याचा मान मुक्त विद्यापीठाला मिळाला आहे. डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर देशाच्या ३६ राज्यांमध्ये आणि ६०० जिल्ह्यांमध्ये पोहोचून तेथील जनतेला डिजिटल साक्षर करण्याचा कार्यक्रम या अभियानात आखण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात तंत्रज्ञान म्हणजेज डिजिटल सेवेच्या बाबतीत नागरिकांना साक्षर करण्याची जबाबदारी मुक्त विद्यापीठाने उचलावी यासाठीचा प्रस्ताव डिजिटल इंडियाच्या सहयोगी संस्थेने दिला आहे. मुक्त विद्यापीठाने ही संधी स्वीकारण्याची मानसिकता केली असून, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीसमोर सदर प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेसुसार महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती तंत्रज्ञान साक्षर व्हावी असा उद्देश आहे. या मोहिमेत मुक्त विद्यापीठाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने तळागाळात पोहोचलेल्या विद्यापीठाने किमान ४५ लाख व्यक्तींना ‘डिजिटल साक्षर’ करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावरील हे प्रशिक्षण देण्यासाठीची संपूर्ण तयारी करण्याची विद्यापीठाची तयारी आहे. याबाबतच कालबद्ध कार्यक्रम आखला जाणार असून, देशाच्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी म्हणून राज्यातील या डिजिटल साक्षरता अभियानात मुक्त विद्यापीठ सहभागी होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत मुक्त विद्यापीठ पोहचले आहे. सुमारे सहा लाखापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या, त्यांचे विविध अभ्यासक्रम, परीक्षा, अभ्याससाहित्य, तंत्रज्ञानाचा वापर यांचा वापर करून विद्यापीठ ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याने मुक्त विद्यापीठाला या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.