शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

मुक्त विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:32 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना, तर रुख्मिणी पुरस्कार मुंबईत उपेक्षित वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना, तर रुख्मिणी पुरस्कार मुंबईत उपेक्षित वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे.  विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी शुक्रवारी (दि. २३) या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली. याशिवाय विशाखा काव्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून ठाणे येथील सुशीलकुमार शिंदे, नाशिक जिल्ह्यातील रवींद्र कांगणे आणि सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांचा समावेश आहे. आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाºया महिलेलाकिंवा महिलांच्या संस्थेला श्रमसेवा पुरस्कार दिला जातो. येथील स्मशानभूमीत काम करणाºया  सुनीता पाटील यांना हा पुरस्कार दिला जाणार असून, २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.कवी कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणाºया विशाखा प्रथम काव्य पुरस्कारासाठी ठाणे येथील नवोदित कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘आत्महत्या करायचं म्हणतंय’ यांची निवड करण्यात आली आहे, तर द्वितीय पुरस्कार ‘येठण’ काव्यसंग्रहासाठी सिन्नर येथील रवींद्र कांगणे यांना देण्यात येणार आहे.  सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांच्या ‘अस्तित्वाचा अजिंठा कोरताना’ या काव्यसंग्रहास तिसºया क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (दि.२७) नाशिक शहरातील गंगापूररोडवरील हॉटेल शगून येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.  कवी किशोर पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.८४ महिलांना मिळवून दिला रोजगारअतिशय मागासलेल्या वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा मल्लू गुडीलू यांना रुख्मिणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी समाजातील ११२ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले आहे. तसेच समाजातील महिलांचे ५८ बचत गट स्थापन केले असून त्या माध्यमातून ८४ महिलांना मुंबईतील हॉटेल्सना चपात्या बनवून देण्याचा रोजगार मिळवून दिला आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ