शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

मुक्त विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:32 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना, तर रुख्मिणी पुरस्कार मुंबईत उपेक्षित वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना, तर रुख्मिणी पुरस्कार मुंबईत उपेक्षित वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे.  विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी शुक्रवारी (दि. २३) या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली. याशिवाय विशाखा काव्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून ठाणे येथील सुशीलकुमार शिंदे, नाशिक जिल्ह्यातील रवींद्र कांगणे आणि सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांचा समावेश आहे. आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाºया महिलेलाकिंवा महिलांच्या संस्थेला श्रमसेवा पुरस्कार दिला जातो. येथील स्मशानभूमीत काम करणाºया  सुनीता पाटील यांना हा पुरस्कार दिला जाणार असून, २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.कवी कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणाºया विशाखा प्रथम काव्य पुरस्कारासाठी ठाणे येथील नवोदित कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘आत्महत्या करायचं म्हणतंय’ यांची निवड करण्यात आली आहे, तर द्वितीय पुरस्कार ‘येठण’ काव्यसंग्रहासाठी सिन्नर येथील रवींद्र कांगणे यांना देण्यात येणार आहे.  सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांच्या ‘अस्तित्वाचा अजिंठा कोरताना’ या काव्यसंग्रहास तिसºया क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (दि.२७) नाशिक शहरातील गंगापूररोडवरील हॉटेल शगून येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.  कवी किशोर पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.८४ महिलांना मिळवून दिला रोजगारअतिशय मागासलेल्या वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा मल्लू गुडीलू यांना रुख्मिणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी समाजातील ११२ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले आहे. तसेच समाजातील महिलांचे ५८ बचत गट स्थापन केले असून त्या माध्यमातून ८४ महिलांना मुंबईतील हॉटेल्सना चपात्या बनवून देण्याचा रोजगार मिळवून दिला आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ