शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुक्त विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:32 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना, तर रुख्मिणी पुरस्कार मुंबईत उपेक्षित वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना, तर रुख्मिणी पुरस्कार मुंबईत उपेक्षित वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे.  विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी शुक्रवारी (दि. २३) या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली. याशिवाय विशाखा काव्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून ठाणे येथील सुशीलकुमार शिंदे, नाशिक जिल्ह्यातील रवींद्र कांगणे आणि सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांचा समावेश आहे. आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाºया महिलेलाकिंवा महिलांच्या संस्थेला श्रमसेवा पुरस्कार दिला जातो. येथील स्मशानभूमीत काम करणाºया  सुनीता पाटील यांना हा पुरस्कार दिला जाणार असून, २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.कवी कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणाºया विशाखा प्रथम काव्य पुरस्कारासाठी ठाणे येथील नवोदित कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘आत्महत्या करायचं म्हणतंय’ यांची निवड करण्यात आली आहे, तर द्वितीय पुरस्कार ‘येठण’ काव्यसंग्रहासाठी सिन्नर येथील रवींद्र कांगणे यांना देण्यात येणार आहे.  सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांच्या ‘अस्तित्वाचा अजिंठा कोरताना’ या काव्यसंग्रहास तिसºया क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (दि.२७) नाशिक शहरातील गंगापूररोडवरील हॉटेल शगून येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.  कवी किशोर पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.८४ महिलांना मिळवून दिला रोजगारअतिशय मागासलेल्या वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा मल्लू गुडीलू यांना रुख्मिणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी समाजातील ११२ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले आहे. तसेच समाजातील महिलांचे ५८ बचत गट स्थापन केले असून त्या माध्यमातून ८४ महिलांना मुंबईतील हॉटेल्सना चपात्या बनवून देण्याचा रोजगार मिळवून दिला आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ