शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ग्रामीण भागात ग्रामस्थांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:09 IST

खामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये थांबले आहेत. संपर्क टळू लागला आहे.

ठळक मुद्देखेडोपाडी पोलिसांचा वॉच नसल्याने लोक घोळक्याने बसत असल्याचे दुर्दैवी चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये थांबले आहेत. संपर्क टळू लागला आहे.याउलट चित्र ग्रामीण भागातील काही गावांमध्ये दिसून येत असून, पारांवर गप्पांचे फड रंगल्याचे आणि ग्रामस्थांचा मुक्त संचार सुरू आहे. पोलीस प्रशासनाने शहरी भागातील गस्त वाढविली मात्र खेडोपाडी पोलिसांचा वॉच नसल्याने लोक घोळक्याने बसत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. साथ आटोक्याबाहेर गेल्यास ग्रामीण जीवनाच्या अघळपघळ सवयींमुळे मार्ग खडतर मानला जात आहे.ग्रामीण भागात घरे छोटी छोटी व जवळ जवळ असतात. संपूर्ण गाव हे एका घरासारखे असते. साहजिकच सर्वांचे एकमेकांशी उठणे बसणे असते. अद्याप ग्रामीण भागात या विषाणूचा संसर्ग झालेला नाही. शिवाय ग्रामीणमध्ये काही गावांत तेवढे गांभीर्यानेही घेतले गेले नाही. त्यामुळे लोक सकाळ-संध्याकाळी घोळक्या-घोळक्याने बसत आहेत.शाळांना सुटी असल्याने लहान मुले सर्रास गावभर खेळत आहे. ही बाब अत्यंत घातक ठरू शकते. ग्रामीण भाग हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत भाग आहे. शिवाय शेतकरी, शेतमजुरांचा भरणा या भागात जास्त आहे. या ठिकाणी साथ पोहोचल्यास ती घराघरात पोहचायला वेळच लागणार नाही. खेड्यातील जीवन हे एकमेकांशी निगडित आहे. पुणे-मुंबई किंवा इतर शहरातून गावी येणाºया लोकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. या लोकांची आरोग्य केंद्रात नोंद करून त्यांची तपासणी केली जात आहे आणि त्यांना घरी बसण्याचा सल्ला देऊन इतरांच्या संपर्कात येऊ नका असे सांगितले जात आहे तरीदेखील काही लोक बाहेर वावरताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातही सक्तीच्या उपाययोजना न केल्यास शहरांपेक्षाही हा भाग सर्वाधिक भरडला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या