शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

ग्रामीण भागात ग्रामस्थांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:09 IST

खामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये थांबले आहेत. संपर्क टळू लागला आहे.

ठळक मुद्देखेडोपाडी पोलिसांचा वॉच नसल्याने लोक घोळक्याने बसत असल्याचे दुर्दैवी चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये थांबले आहेत. संपर्क टळू लागला आहे.याउलट चित्र ग्रामीण भागातील काही गावांमध्ये दिसून येत असून, पारांवर गप्पांचे फड रंगल्याचे आणि ग्रामस्थांचा मुक्त संचार सुरू आहे. पोलीस प्रशासनाने शहरी भागातील गस्त वाढविली मात्र खेडोपाडी पोलिसांचा वॉच नसल्याने लोक घोळक्याने बसत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. साथ आटोक्याबाहेर गेल्यास ग्रामीण जीवनाच्या अघळपघळ सवयींमुळे मार्ग खडतर मानला जात आहे.ग्रामीण भागात घरे छोटी छोटी व जवळ जवळ असतात. संपूर्ण गाव हे एका घरासारखे असते. साहजिकच सर्वांचे एकमेकांशी उठणे बसणे असते. अद्याप ग्रामीण भागात या विषाणूचा संसर्ग झालेला नाही. शिवाय ग्रामीणमध्ये काही गावांत तेवढे गांभीर्यानेही घेतले गेले नाही. त्यामुळे लोक सकाळ-संध्याकाळी घोळक्या-घोळक्याने बसत आहेत.शाळांना सुटी असल्याने लहान मुले सर्रास गावभर खेळत आहे. ही बाब अत्यंत घातक ठरू शकते. ग्रामीण भाग हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत भाग आहे. शिवाय शेतकरी, शेतमजुरांचा भरणा या भागात जास्त आहे. या ठिकाणी साथ पोहोचल्यास ती घराघरात पोहचायला वेळच लागणार नाही. खेड्यातील जीवन हे एकमेकांशी निगडित आहे. पुणे-मुंबई किंवा इतर शहरातून गावी येणाºया लोकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. या लोकांची आरोग्य केंद्रात नोंद करून त्यांची तपासणी केली जात आहे आणि त्यांना घरी बसण्याचा सल्ला देऊन इतरांच्या संपर्कात येऊ नका असे सांगितले जात आहे तरीदेखील काही लोक बाहेर वावरताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातही सक्तीच्या उपाययोजना न केल्यास शहरांपेक्षाही हा भाग सर्वाधिक भरडला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या