शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बेमोसमी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नांदूरशिंगोटे : ढगाळ हवामान व बेमोसमी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अचानक पावसाने हजेरी ...

नांदूरशिंगोटे : ढगाळ हवामान व बेमोसमी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते.

सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत, तर लाल कांदे काढणीस आले आहेत. परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा धास्तावला आहे. दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी होत असताना, पावसाने चिंता वाढविली आहे. गतवर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन काढता आले नाही. दरवर्षी बळीराजाला आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने त्यांचे नियोजन बिघडत आहे. शेतीमालाला भाव नाही, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा परिस्थितीत शेतकरी जीवन जगत असताना, दुसरीकडे घरगुती वापरांच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, तसेच काही भागात अद्याप उन्हाळ कांदा लागवड सुरू असल्याने, त्यावरही परिणाम झाला.