शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बेमोसमी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नांदूरशिंगोटे : ढगाळ हवामान व बेमोसमी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अचानक पावसाने हजेरी ...

नांदूरशिंगोटे : ढगाळ हवामान व बेमोसमी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते.

सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत, तर लाल कांदे काढणीस आले आहेत. परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा धास्तावला आहे. दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी होत असताना, पावसाने चिंता वाढविली आहे. गतवर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन काढता आले नाही. दरवर्षी बळीराजाला आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने त्यांचे नियोजन बिघडत आहे. शेतीमालाला भाव नाही, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा परिस्थितीत शेतकरी जीवन जगत असताना, दुसरीकडे घरगुती वापरांच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, तसेच काही भागात अद्याप उन्हाळ कांदा लागवड सुरू असल्याने, त्यावरही परिणाम झाला.