शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बेमोसमी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नांदूरशिंगोटे : ढगाळ हवामान व बेमोसमी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अचानक पावसाने हजेरी ...

नांदूरशिंगोटे : ढगाळ हवामान व बेमोसमी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते.

सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत, तर लाल कांदे काढणीस आले आहेत. परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा धास्तावला आहे. दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी होत असताना, पावसाने चिंता वाढविली आहे. गतवर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन काढता आले नाही. दरवर्षी बळीराजाला आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने त्यांचे नियोजन बिघडत आहे. शेतीमालाला भाव नाही, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा परिस्थितीत शेतकरी जीवन जगत असताना, दुसरीकडे घरगुती वापरांच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, तसेच काही भागात अद्याप उन्हाळ कांदा लागवड सुरू असल्याने, त्यावरही परिणाम झाला.