शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

अवघे दोन हजार पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: November 17, 2015 23:18 IST

बारावी : नाशिक विभागाचा निकाल २० टक्के

नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या आॅक्टोबर परीक्षेसाठी एकूण दहा हजार १३६ पुनर्परीक्षार्थी नाशिक विभागातून बसले होते. त्यापैकी अवघे दोन हजार १७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. त्यामुळे विभागाचा निकाल केवळ १९.२० टक्के इतका लागला. तर नाशिक शहराचा १६.३० टक्के इतका निकाल लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांनी निकालात घट झाली आहे.नाशिक विभागीय मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एकूण २९ केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेसाठी दहा हजार ३४४ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता; मात्र दहा हजार १३६ विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. त्यापैकी केवळ दोन हजार १७ विद्यार्थी विभागातून उत्तीर्ण होऊ शकले. परिणामी राज्यात नाशिकचे स्थान सर्वांत खाली घसरले आहे. एकूणच पुनर्परीक्षार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाशिक विभागात गटांगळ्या खाल्ल्याने निकालावर परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून पाच हजार ७४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ९३६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. धुळे येथून दोन हजार ७८४ पैकी ६२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने केवळ १९.६९ टक्के निकाल लागला. तसेच नंदुरबारमधून केवळ ९०० पुनर्परीक्षार्थींनी बारावीची परीक्षा दिली व त्यापैकी ३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने नाशिक विभागात सर्वाधिक ३५.५६ टक्के इतका नंदुरबारचा निकाल लागला. निकालाचा घसरता आलेखबारावीच्या आॅक्टोबर परीक्षेची विभागाची टक्केवारी गेल्या दोन वर्षांपासून घसरत आहे. त्यामुळे पुनर्परीक्षार्थींचे गटांगळ्या खाणे सुरूच असल्याचे दिसून येत आहे. २०१३ साली बारावीच्या आॅक्टोबर परीक्षेचा निकाल २५.१२, तर २०१४ साली २४.३६ टक्के इतका लागला होता.