शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अवघ्या सहा टक्के पेरण्या !

By श्याम बागुल | Updated: July 4, 2019 19:24 IST

मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही.

ठळक मुद्देगत वर्षाच्या तुलनेत नऊपट घट : तीन तालुके कोरडेच पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

नाशिक : यंदा पावसाचे आगमन लांबणीवर पडून जिल्ह्यात जेमतेम १५ टक्केच पाऊस झाला असून, शेतात पेरणीयोग्य पाऊस अजूनही पडलेला नसल्यामुळे जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवघ्या सहा टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत. पाऊस अजूनही पाहिजे त्या प्रमाणात न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पेरण्यांमध्ये नऊपट घट झाल्याने कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात असून, अशीच परिस्थिती राहिल्यास कृषी उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. शिवाय यंदा अवकाळी पावसानेदेखील हूल दिल्यामुळे या पावसाच्या भरवशावर शेतीची मशागत करून वाट पाहणाºया शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. एरव्ही अवकाळी पावसामुळे शेतीची धूप निघण्यास मदत होऊन पहिल्या पावसानंतर शेतकरी पेरणीला प्राधान्य देतात, पण यंदा तशी वेळ आली नाही. जूनच्या शेवटच्या दिवसात पावसाने हजेरी लावली. साधारणत: दोन दिवस जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीची धूप झाली नाही, किंबहुना शेत ओले झाले नाही. त्यातही काही तालुक्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने त्यांनी पेरणीला सुरुवात केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील पेरणीयोग्य असलेल्या साडेपाच लाख हेक्टरपैकी अवघ्या ३३,३९५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या असून, त्याचे प्रमाण ५.८० टक्के इतकेच आहे. गेल्या वर्षी १० जुलैपर्यंत जिल्ह्यात ३,४३,०७६ हेक्टरवर म्हणजेच ५३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. गेल्या वर्षाच्या तुलनेचा विचार करता यंदाची परिस्थिती चिंताजनक असून, पाऊस अशाच प्रकारे लांबणीवर पडला तर पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक