शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अवघ्या सहा टक्के पेरण्या !

By श्याम बागुल | Updated: July 4, 2019 19:24 IST

मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही.

ठळक मुद्देगत वर्षाच्या तुलनेत नऊपट घट : तीन तालुके कोरडेच पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

नाशिक : यंदा पावसाचे आगमन लांबणीवर पडून जिल्ह्यात जेमतेम १५ टक्केच पाऊस झाला असून, शेतात पेरणीयोग्य पाऊस अजूनही पडलेला नसल्यामुळे जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवघ्या सहा टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत. पाऊस अजूनही पाहिजे त्या प्रमाणात न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पेरण्यांमध्ये नऊपट घट झाल्याने कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात असून, अशीच परिस्थिती राहिल्यास कृषी उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. शिवाय यंदा अवकाळी पावसानेदेखील हूल दिल्यामुळे या पावसाच्या भरवशावर शेतीची मशागत करून वाट पाहणाºया शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. एरव्ही अवकाळी पावसामुळे शेतीची धूप निघण्यास मदत होऊन पहिल्या पावसानंतर शेतकरी पेरणीला प्राधान्य देतात, पण यंदा तशी वेळ आली नाही. जूनच्या शेवटच्या दिवसात पावसाने हजेरी लावली. साधारणत: दोन दिवस जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीची धूप झाली नाही, किंबहुना शेत ओले झाले नाही. त्यातही काही तालुक्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने त्यांनी पेरणीला सुरुवात केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील पेरणीयोग्य असलेल्या साडेपाच लाख हेक्टरपैकी अवघ्या ३३,३९५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या असून, त्याचे प्रमाण ५.८० टक्के इतकेच आहे. गेल्या वर्षी १० जुलैपर्यंत जिल्ह्यात ३,४३,०७६ हेक्टरवर म्हणजेच ५३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. गेल्या वर्षाच्या तुलनेचा विचार करता यंदाची परिस्थिती चिंताजनक असून, पाऊस अशाच प्रकारे लांबणीवर पडला तर पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक