शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

174 गावांत केवळ एक गणपती : पोलिसांनी घातली साद; नाशिककर ग्रामस्थांनी दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 23:43 IST

नाशिकच्या ग्रामीण भागात केवळ 324 सार्वजनिक मंडळांकडून 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच 174 गावांनी 'एक गाव एक गणपती'चा नियम पाळला आहे.

नाशिक - यंदा देश कोरोना महामारीचा मुकाबला करत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. यामुळे शासनाकडून गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपावर मर्यादा घालत साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर भर देण्याचे आवाहन केले गेले. पोलीस प्रशासन नियमांची अंमलबजावणी करण्याकरिता प्रयत्नशील असून नागरिकांना विश्वासात घेत जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाने साद घातली अन गावकऱ्यांनी उत्कृष्टरीत्या त्यांना साथ दिली. यंदा नाशिकच्या ग्रामीण भागात केवळ 324 सार्वजनिक मंडळांकडून 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच 174 गावांनी 'एक गाव एक गणपती'चा नियम पाळला आहे.नाशिक जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडादेखील 30 हजारापार रविवारी गेला. यामध्ये ग्रामीण भागात अद्याप 7 हजार 433 रुग्ण विविध गावांमध्ये आढळून आले आहेत. गणेशोत्सव साजरा होत असताना कोरोनाचे संक्रमण अधिक फोफावत जाऊ नये, यासाठी शासनाने कोविड-१९ कोरोणा विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी काही मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक जाहीर केले. यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सर्व अपर पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची संयुक्त बैठक घेत विविध तालुक्यातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकत्यांच्या बैठका घेत कोरोणा विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक गावात 'एक गाव एक गणपती' बसविण्यासाठी आवाहन करण्याचा सूचना दिल्या. तशाप्रकारे जनजागृती करण्यात आल्याने नाशिक ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.गतवर्षी २ हजार ८४० मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापणा केली होती. मात्र नाशिक ग्रामीण पोलीसांच्या आवाहानाला प्रतिसाद देत यावर्षी 324 सार्वजनिक मंडळे व 174 गावांमध्ये एक गांव एक गणपती अशा प्रकारे सर्व तालुके मिळून केवळ ४९६ गणेश मंडळांना सार्वजनिकरित्या शासकिय नियमांचे पालन करीत श्रींची स्थापना करण्याची ऑनलाइन परवानगी दिली गेली आहे, अशी माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली.येत्या 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती विसर्जन मिरवणुकांना कोणतीही परवानगी कोणालाही देण्यात आलेली नाही, त्यामुळे गणरायाला वाजतगाजत निरोप न देता शांतपणे शासनाच्या नियमांचे पालन करत निरोप दयावा असे आवाहन सिंह यांनी केले आहे.कायदासुव्यवस्था टिकवण्यासाठी चोख बंदोबस्तयंदा गणेशोत्सव व मुहर्रम हे दहा दिवसीय सण सोबतच साजरे होत आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. गणेश मंडळांनी श्रींची घरगुती अथवा घराजवळ बनविण्यात आलेल्या कुंडातच विसर्जन करावे. कोणत्याही मंडळांनी स्थापना ठिकाणापासुन दुर अंतरावरील ठिकाणी गणेश विसर्जन करु नये. कोविड-१९ संसर्गाच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच योग्य ते शारीरिक अंतर राखावे व मास्कचा वापर करावा, अशा विविध सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव