शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

174 गावांत केवळ एक गणपती : पोलिसांनी घातली साद; नाशिककर ग्रामस्थांनी दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 23:43 IST

नाशिकच्या ग्रामीण भागात केवळ 324 सार्वजनिक मंडळांकडून 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच 174 गावांनी 'एक गाव एक गणपती'चा नियम पाळला आहे.

नाशिक - यंदा देश कोरोना महामारीचा मुकाबला करत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. यामुळे शासनाकडून गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपावर मर्यादा घालत साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर भर देण्याचे आवाहन केले गेले. पोलीस प्रशासन नियमांची अंमलबजावणी करण्याकरिता प्रयत्नशील असून नागरिकांना विश्वासात घेत जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाने साद घातली अन गावकऱ्यांनी उत्कृष्टरीत्या त्यांना साथ दिली. यंदा नाशिकच्या ग्रामीण भागात केवळ 324 सार्वजनिक मंडळांकडून 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच 174 गावांनी 'एक गाव एक गणपती'चा नियम पाळला आहे.नाशिक जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडादेखील 30 हजारापार रविवारी गेला. यामध्ये ग्रामीण भागात अद्याप 7 हजार 433 रुग्ण विविध गावांमध्ये आढळून आले आहेत. गणेशोत्सव साजरा होत असताना कोरोनाचे संक्रमण अधिक फोफावत जाऊ नये, यासाठी शासनाने कोविड-१९ कोरोणा विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी काही मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक जाहीर केले. यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सर्व अपर पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची संयुक्त बैठक घेत विविध तालुक्यातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकत्यांच्या बैठका घेत कोरोणा विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक गावात 'एक गाव एक गणपती' बसविण्यासाठी आवाहन करण्याचा सूचना दिल्या. तशाप्रकारे जनजागृती करण्यात आल्याने नाशिक ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.गतवर्षी २ हजार ८४० मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापणा केली होती. मात्र नाशिक ग्रामीण पोलीसांच्या आवाहानाला प्रतिसाद देत यावर्षी 324 सार्वजनिक मंडळे व 174 गावांमध्ये एक गांव एक गणपती अशा प्रकारे सर्व तालुके मिळून केवळ ४९६ गणेश मंडळांना सार्वजनिकरित्या शासकिय नियमांचे पालन करीत श्रींची स्थापना करण्याची ऑनलाइन परवानगी दिली गेली आहे, अशी माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली.येत्या 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती विसर्जन मिरवणुकांना कोणतीही परवानगी कोणालाही देण्यात आलेली नाही, त्यामुळे गणरायाला वाजतगाजत निरोप न देता शांतपणे शासनाच्या नियमांचे पालन करत निरोप दयावा असे आवाहन सिंह यांनी केले आहे.कायदासुव्यवस्था टिकवण्यासाठी चोख बंदोबस्तयंदा गणेशोत्सव व मुहर्रम हे दहा दिवसीय सण सोबतच साजरे होत आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. गणेश मंडळांनी श्रींची घरगुती अथवा घराजवळ बनविण्यात आलेल्या कुंडातच विसर्जन करावे. कोणत्याही मंडळांनी स्थापना ठिकाणापासुन दुर अंतरावरील ठिकाणी गणेश विसर्जन करु नये. कोविड-१९ संसर्गाच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच योग्य ते शारीरिक अंतर राखावे व मास्कचा वापर करावा, अशा विविध सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव