शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

पुरुष उमेदवारांसाठी एकमेव आखाडा

By admin | Updated: January 20, 2017 00:22 IST

प्रचंड चुरस : उमेदवारीसाठी पहिली लढत स्वपक्षातील इच्छुकांसोबतच

शैलेश कर्पे/सचिन सांगळे सिन्नरतालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच गट महिलांसाठी राखीव आहेत. एकमेव नांदूरशिंगोटे गट इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने या गटातून पुुरुषांना मिनी मंत्रालयात पाऊल ठेवता येणार आहे. त्यामुळे या गटात उमेदवारी मिळविण्यासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. भाजपा व शिवसेना यांच्या खरी चुरस रंगण्याची शक्यता असून, उमेदवारी न मिळालेले उमेदवार बंडखोरी करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांना पहिली लढत स्वपक्षातील इच्छुकांसोबतच द्यावी लागणार आहे. पूर्वीचा जुना वावी व गेल्या दहा वर्षांपासून नांदूरशिंगोटे नावाने ओळखला जाणारा सदर गट अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या गटात मराठा आणि वंजारी या दोन समाजाचे प्राबल्य आहे. आरक्षणाचा अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून या गटातून वंजारी समाजाचा उमेदवार विजयी होण्याची परंपरा आहे. आजपर्यंत या गटात विद्यमान आमदारांचे वर्चस्व राहिल्याचा इतिहास आहे. माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचे या गटात पंधरा वर्षे वर्चस्व राहिले. त्यानंतर २००७ साली माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे बाळासाहेब वाघ हे जिल्हा परिषद सदस्य झाले. गेल्या निवडणुकीत नांदूरशिंगोटे गट अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होता. २०१२ च्या निवडणुकीत कोकाटे समर्थक शीला गवारे या गटातून विजयी झाल्या. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून या गटावर माजी आमदार कोकाटे यांचे वर्चस्व आहे. नांदूरशिंगोटे गटातील पांगरी गण माजी आमदार कोकाटे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पांगरी गणातून भरभक्कम आघाडी घेणारा उमेदवार जिल्हा परिषदेत जात असल्याचा गेल्या दहा वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीतही नांदूरशिंगोटे गटात पांगरी गणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सन १९९२ पासून नांदूरशिंगोटे गटातून सुरेश गर्जे, स्व. कमल सानप, शुभांगी गर्जे, बाळासाहेब वाघ व शीला गवारे विजयी झाले आहेत. मात्र या गटात अद्याप एकाही सदस्याला जिल्हा परिषदेत सभापतिपद मिळाले नाही. या निवडणुकीत तालुक्यातील सहापैकी पाच गट महिलांसाठी राखीव आहेत. एकमेव नांदूरशिंगोटे गटातून पुुरुष उमेदवार जिल्हा परिषदेत जाणार आहे. तालुक्यातील प्रश्न व समस्या मांडण्याची व विविध विकासकामांसाठी निधी आणण्याची जबाबदारी या गटातून विजयी होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवारी देताना तगड्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवेल असेच चित्र आहे. मिनी मंत्रालयात भांडून तालुक्यातील प्रश्नांची तड लावणारा व विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणणारा उमेदवार प्रत्येक पक्षाकडून अभिप्रेत आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी सध्या शिवसेना व भाजपात प्रचंड चुरस असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेत पाऊल ठेवण्यासाठी पक्षाची उमेदवारी मिळविण्याची पहिली लढत स्वकीयांसोबतच असल्याचे शिवसेना व भाजपात दिसून येत आहे. इच्छुकांनी गटातील सर्वच गावे पिंजून काढली आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल याची पक्की खात्री अद्याप कोणालाही नसल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे.