शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

पुरुष उमेदवारांसाठी एकमेव आखाडा

By admin | Updated: January 20, 2017 00:22 IST

प्रचंड चुरस : उमेदवारीसाठी पहिली लढत स्वपक्षातील इच्छुकांसोबतच

शैलेश कर्पे/सचिन सांगळे सिन्नरतालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच गट महिलांसाठी राखीव आहेत. एकमेव नांदूरशिंगोटे गट इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने या गटातून पुुरुषांना मिनी मंत्रालयात पाऊल ठेवता येणार आहे. त्यामुळे या गटात उमेदवारी मिळविण्यासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. भाजपा व शिवसेना यांच्या खरी चुरस रंगण्याची शक्यता असून, उमेदवारी न मिळालेले उमेदवार बंडखोरी करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांना पहिली लढत स्वपक्षातील इच्छुकांसोबतच द्यावी लागणार आहे. पूर्वीचा जुना वावी व गेल्या दहा वर्षांपासून नांदूरशिंगोटे नावाने ओळखला जाणारा सदर गट अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या गटात मराठा आणि वंजारी या दोन समाजाचे प्राबल्य आहे. आरक्षणाचा अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून या गटातून वंजारी समाजाचा उमेदवार विजयी होण्याची परंपरा आहे. आजपर्यंत या गटात विद्यमान आमदारांचे वर्चस्व राहिल्याचा इतिहास आहे. माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचे या गटात पंधरा वर्षे वर्चस्व राहिले. त्यानंतर २००७ साली माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे बाळासाहेब वाघ हे जिल्हा परिषद सदस्य झाले. गेल्या निवडणुकीत नांदूरशिंगोटे गट अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होता. २०१२ च्या निवडणुकीत कोकाटे समर्थक शीला गवारे या गटातून विजयी झाल्या. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून या गटावर माजी आमदार कोकाटे यांचे वर्चस्व आहे. नांदूरशिंगोटे गटातील पांगरी गण माजी आमदार कोकाटे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पांगरी गणातून भरभक्कम आघाडी घेणारा उमेदवार जिल्हा परिषदेत जात असल्याचा गेल्या दहा वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीतही नांदूरशिंगोटे गटात पांगरी गणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सन १९९२ पासून नांदूरशिंगोटे गटातून सुरेश गर्जे, स्व. कमल सानप, शुभांगी गर्जे, बाळासाहेब वाघ व शीला गवारे विजयी झाले आहेत. मात्र या गटात अद्याप एकाही सदस्याला जिल्हा परिषदेत सभापतिपद मिळाले नाही. या निवडणुकीत तालुक्यातील सहापैकी पाच गट महिलांसाठी राखीव आहेत. एकमेव नांदूरशिंगोटे गटातून पुुरुष उमेदवार जिल्हा परिषदेत जाणार आहे. तालुक्यातील प्रश्न व समस्या मांडण्याची व विविध विकासकामांसाठी निधी आणण्याची जबाबदारी या गटातून विजयी होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवारी देताना तगड्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवेल असेच चित्र आहे. मिनी मंत्रालयात भांडून तालुक्यातील प्रश्नांची तड लावणारा व विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणणारा उमेदवार प्रत्येक पक्षाकडून अभिप्रेत आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी सध्या शिवसेना व भाजपात प्रचंड चुरस असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेत पाऊल ठेवण्यासाठी पक्षाची उमेदवारी मिळविण्याची पहिली लढत स्वकीयांसोबतच असल्याचे शिवसेना व भाजपात दिसून येत आहे. इच्छुकांनी गटातील सर्वच गावे पिंजून काढली आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल याची पक्की खात्री अद्याप कोणालाही नसल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे.