शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष उमेदवारांसाठी एकमेव आखाडा

By admin | Updated: January 20, 2017 00:22 IST

प्रचंड चुरस : उमेदवारीसाठी पहिली लढत स्वपक्षातील इच्छुकांसोबतच

शैलेश कर्पे/सचिन सांगळे सिन्नरतालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच गट महिलांसाठी राखीव आहेत. एकमेव नांदूरशिंगोटे गट इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने या गटातून पुुरुषांना मिनी मंत्रालयात पाऊल ठेवता येणार आहे. त्यामुळे या गटात उमेदवारी मिळविण्यासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. भाजपा व शिवसेना यांच्या खरी चुरस रंगण्याची शक्यता असून, उमेदवारी न मिळालेले उमेदवार बंडखोरी करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांना पहिली लढत स्वपक्षातील इच्छुकांसोबतच द्यावी लागणार आहे. पूर्वीचा जुना वावी व गेल्या दहा वर्षांपासून नांदूरशिंगोटे नावाने ओळखला जाणारा सदर गट अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या गटात मराठा आणि वंजारी या दोन समाजाचे प्राबल्य आहे. आरक्षणाचा अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून या गटातून वंजारी समाजाचा उमेदवार विजयी होण्याची परंपरा आहे. आजपर्यंत या गटात विद्यमान आमदारांचे वर्चस्व राहिल्याचा इतिहास आहे. माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचे या गटात पंधरा वर्षे वर्चस्व राहिले. त्यानंतर २००७ साली माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे बाळासाहेब वाघ हे जिल्हा परिषद सदस्य झाले. गेल्या निवडणुकीत नांदूरशिंगोटे गट अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होता. २०१२ च्या निवडणुकीत कोकाटे समर्थक शीला गवारे या गटातून विजयी झाल्या. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून या गटावर माजी आमदार कोकाटे यांचे वर्चस्व आहे. नांदूरशिंगोटे गटातील पांगरी गण माजी आमदार कोकाटे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पांगरी गणातून भरभक्कम आघाडी घेणारा उमेदवार जिल्हा परिषदेत जात असल्याचा गेल्या दहा वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीतही नांदूरशिंगोटे गटात पांगरी गणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सन १९९२ पासून नांदूरशिंगोटे गटातून सुरेश गर्जे, स्व. कमल सानप, शुभांगी गर्जे, बाळासाहेब वाघ व शीला गवारे विजयी झाले आहेत. मात्र या गटात अद्याप एकाही सदस्याला जिल्हा परिषदेत सभापतिपद मिळाले नाही. या निवडणुकीत तालुक्यातील सहापैकी पाच गट महिलांसाठी राखीव आहेत. एकमेव नांदूरशिंगोटे गटातून पुुरुष उमेदवार जिल्हा परिषदेत जाणार आहे. तालुक्यातील प्रश्न व समस्या मांडण्याची व विविध विकासकामांसाठी निधी आणण्याची जबाबदारी या गटातून विजयी होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवारी देताना तगड्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवेल असेच चित्र आहे. मिनी मंत्रालयात भांडून तालुक्यातील प्रश्नांची तड लावणारा व विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणणारा उमेदवार प्रत्येक पक्षाकडून अभिप्रेत आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी सध्या शिवसेना व भाजपात प्रचंड चुरस असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेत पाऊल ठेवण्यासाठी पक्षाची उमेदवारी मिळविण्याची पहिली लढत स्वकीयांसोबतच असल्याचे शिवसेना व भाजपात दिसून येत आहे. इच्छुकांनी गटातील सर्वच गावे पिंजून काढली आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल याची पक्की खात्री अद्याप कोणालाही नसल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे.