शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

जिल्हा बँकेच्या एकमेव प्रशासकाचाही राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 01:42 IST

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळातील एकमेव प्रशासक असलेले आरिफ खान यांनीही आपल्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, संचालक, प्रशासक नसल्याने जिल्हा बँक वाऱ्यावर सुटल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देराजकीय दबावाची चर्चा : नासाका, कर्जवसुलीचा वारेमाप तगादा

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळातील एकमेव प्रशासक असलेले आरिफ खान यांनीही आपल्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, संचालक, प्रशासक नसल्याने जिल्हा बँक वाऱ्यावर सुटल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा अनागोंदी कारभार, कोट्यवधीचा खर्च व थकीत कर्ज या साऱ्या कारणांमुळे सहकार विभागाकडून बँकेची चौकशी सुरू होती. बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक नुकसानीला आजी-माजी संचालकांना जबाबदार धरून संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. तथापि, सहकार विभागाच्या या आदेशाविरुद्ध संचालकांलनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती. त्यानंतर संचालकांनी कामकाज पुन्हा सुरू केले. दरम्यान, उच्च न्यायालयाने बँकेच्या संचालक मंडळ बरखास्तीवरील स्थगिती उठविल्याने संचालकांना घरी पाठविण्यात आले व त्यानंतर २३ मार्च २०२१ रोजी सहकार विभागाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तीनसदस्यीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. त्यात सेवानिवृत्त निबंधक आरिफ खान, सहकार अधिकारी चंद्रकांत बारी व सनदी लेखापाल तुषार पगार यांचा समावेश होता. तथापि, बँकेच्या एकूणच कारभाराची बजबजपुरी पाहता, तुषार पगार यांनी दुसऱ्याच दिवशी प्रशासकीय मंडळात कामकाज करण्यास असमर्थता व्यक्त केली, तर चंद्रकांत बारी व आरिफ खान यांनी काही महिने बँकेच्या कामकाजात लक्ष घातले. मात्र बँकेच्या थकीत कर्ज वसुली प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे पाहून बारी यांनी स्वत:ला प्रशासकीय मंडळापासून वेगळे करून घेतले होते. त्यामुळे एकमेव आरिफ खान यांच्यावरच बँकेची धुरा होती. त्यांनीही मंगळवारी (दि. १४) व्यक्तिगत कारणास्तव प्रशासकीय मंडळाचा राजीनामा देत असल्याचे पत्र सहकार आयुक्तांना पाठविले आहे.

चौकट========

राजकारण्यांकडून छळ?

दरम्यान, जिल्हा बँकेने नाशिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव प्रशासकांवर टाकण्यात येत होता. त्यातून शेतकरी, सरपंच अशांना पुढे करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला, तर दुसरीकडे बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी थकबाकीदारांविरुद्ध मालमत्ता जप्तीची मोहीम हाती घेतली असता, त्यातूनही राजकीय व्यक्ती व माजी संचालकांचा हस्तक्षेप वाढला होता. या साऱ्या गोष्टीला कंटाळूनच आरिफ खान यांनी प्रशासकीय मंडळाचा राजीनामा दिल्याची चर्चा बँकेत केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक