शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

लागंगापूर धरणात फक्त ३७ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:06 IST

नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्णातील धरणांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली असून, मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जेमतेम ३७ टक्के साठा शिल्लक राहिला आहे, तर धरण समूहात ४८ टक्के साठा आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ३२ टक्के साठा असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देसमूहात ४८ टक्के : जिल्ह्यात जेमतेम ३२ टक्के; उन्हाचा तडाखा वाढ

 

 

नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्णातील धरणांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली असून, मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जेमतेम ३७ टक्के साठा शिल्लक राहिला आहे, तर धरण समूहात ४८ टक्के साठा आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ३२ टक्के साठा असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.यंदा पावसाळ्यात जिल्ह्णात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला असून, संपूर्ण हंगामात फक्त ८२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. त्यातही पावसाचे माहेरघर असलेल्या चार तालुक्यांमध्येच पावसाने चांगली हजेरी लावली. अन्य तालुक्यांमध्ये जेमतेम झालेल्या पावसामुळे धरणांमध्येदेखील ७२ टक्के जलसाठा होऊ शकला. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २८ टक्के धरणांमध्ये जलसाठा कमी असल्याने धरणातील पाण्याचे नियोजन करणे अवघड झाले होते. जिल्ह्णातील अन्य धरणांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. पालखेडमध्ये जेमतेम १० टक्के तर कडवा ९, माणिकपुंज ७ व भोजापूर, भावलीमध्ये ६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.नागासाक्याने कधीच तळ गाठल्याने त्यात पाण्याचा पत्ताच नाही. जिल्ह्णातील सर्व धरणे मिळून जेमतेम ३२ टक्के पाणी साठले असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ४८ टक्क्यावर होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला असून, आता पाण्याची मागणी वाढणार आहे. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांबरोबरच टंचाईग्रस्त गावांसाठी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून पाणी उचलावे लागणार आहे. शिवाय धरणातील गळती वउन्हामुळे होणाऱ्या बाष्पिभवनाचा विचार करता ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिककरांवरही पाणीटंचाईचे संकट सुदैवाने जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीची लाट असल्याने पाण्याची मागणी कमी झाली असली तरी, धरणातील गळती, विविध आरक्षणाचा विचार करता धरणांमधून पाणी सोडावे लागले. त्याचाच भाग म्हणून ९२ टक्के भरलेले गंगापूर धरणात मार्चच्या पहिल्या आठवड्यात फक्त ३७ टक्के पाणी शिल्लक राहिले असून, समूहात ४८ टक्के साठा आहे. धरण समूहातील कश्यपी धरणग्रस्तांनी पाणी सोडण्यास विरोध दर्शविल्याने या धरणात १६८६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९१ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नाशिककरांनाही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.