शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

लागंगापूर धरणात फक्त ३७ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:06 IST

नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्णातील धरणांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली असून, मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जेमतेम ३७ टक्के साठा शिल्लक राहिला आहे, तर धरण समूहात ४८ टक्के साठा आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ३२ टक्के साठा असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देसमूहात ४८ टक्के : जिल्ह्यात जेमतेम ३२ टक्के; उन्हाचा तडाखा वाढ

 

 

नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्णातील धरणांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली असून, मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जेमतेम ३७ टक्के साठा शिल्लक राहिला आहे, तर धरण समूहात ४८ टक्के साठा आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ३२ टक्के साठा असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.यंदा पावसाळ्यात जिल्ह्णात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला असून, संपूर्ण हंगामात फक्त ८२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. त्यातही पावसाचे माहेरघर असलेल्या चार तालुक्यांमध्येच पावसाने चांगली हजेरी लावली. अन्य तालुक्यांमध्ये जेमतेम झालेल्या पावसामुळे धरणांमध्येदेखील ७२ टक्के जलसाठा होऊ शकला. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २८ टक्के धरणांमध्ये जलसाठा कमी असल्याने धरणातील पाण्याचे नियोजन करणे अवघड झाले होते. जिल्ह्णातील अन्य धरणांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. पालखेडमध्ये जेमतेम १० टक्के तर कडवा ९, माणिकपुंज ७ व भोजापूर, भावलीमध्ये ६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.नागासाक्याने कधीच तळ गाठल्याने त्यात पाण्याचा पत्ताच नाही. जिल्ह्णातील सर्व धरणे मिळून जेमतेम ३२ टक्के पाणी साठले असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ४८ टक्क्यावर होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला असून, आता पाण्याची मागणी वाढणार आहे. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांबरोबरच टंचाईग्रस्त गावांसाठी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून पाणी उचलावे लागणार आहे. शिवाय धरणातील गळती वउन्हामुळे होणाऱ्या बाष्पिभवनाचा विचार करता ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिककरांवरही पाणीटंचाईचे संकट सुदैवाने जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीची लाट असल्याने पाण्याची मागणी कमी झाली असली तरी, धरणातील गळती, विविध आरक्षणाचा विचार करता धरणांमधून पाणी सोडावे लागले. त्याचाच भाग म्हणून ९२ टक्के भरलेले गंगापूर धरणात मार्चच्या पहिल्या आठवड्यात फक्त ३७ टक्के पाणी शिल्लक राहिले असून, समूहात ४८ टक्के साठा आहे. धरण समूहातील कश्यपी धरणग्रस्तांनी पाणी सोडण्यास विरोध दर्शविल्याने या धरणात १६८६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९१ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नाशिककरांनाही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.